केवळ आनंदच नव्हे तर सुबत्ताही आणतात घरात पाळले जाणारे प्राणी

मुंबई: अनेकजण आपल्या घरात विविध प्राणी पाळतात. कोणाला कुत्रा पाळायला आवडतो तर कोणाला मांजर. कोणी आपल्या घरात पोपट पाळतात तर काहीजण गाय, म्हैस. आपल्या घरात पाळल्या जाणाऱ्या प्राण्यांसोबतही आपले नाते इतके गाढ होते की ते आपल्या घरातील एक सदस्यच होऊन जातात.


या प्राण्यांची आपल्या मुलाप्रमाणे प्रेमाने काळजी घेतली जाते. मात्र तुम्हाला माहीत आहे का की वास्तुशास्त्रात अशा काही प्राण्यांबद्दल सांगण्यात आले आहे ज्यांना घरात पाळल्यास सकारात्मक ऊर्जा येते. सोबतच हे प्राणी आपल्या घरात सुख-समृद्धी घेऊन येतात.



मासे


तुम्ही मासे पाळण्याच्या फायद्याबद्दल खूप ऐकले असेल तसेच अनेक घरांमध्ये पाहिलेही असेल. वास्तुशास्त्रात मासे पाळणे शुभ मानले गेले आहे. असे मानतात की मासे पाळल्याने घरात आर्थिक तंगी येत नाही तसेच नेहमी घरात भरभराट राहते.



पोपट


तुम्ही अनेक घरांमध्ये पोपट पाळलेला पाहिला असेल. वास्तुनुसार पोपट तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आणतो. अशा घरात नेहमी आनंदाचे वातावरण असते. मात्र लक्षात ठेवा की पोपट पाळताना त्याची पूर्ण काळजी घ्या. तसेच तो नेहमी खुश राहील याकडे लक्ष द्या.



ससा


हा एक छोटासा जीव अतिशय कोमल असतो. ससा पाळणेही शुभ मानले गेले आहे. सोबतच म्हटले जाते की ससा पाळल्याने घरात शुभ गोष्टी होतात. यामुळे घराचे वातावरण चांगले राहते. सोबतच धन प्राप्तीचेही संकेतही मिळतात.

Comments
Add Comment

हत्ती हटेना... वनविभाग पथक हतबल!

गोवा वन खात्याचे पथक सिंधुदुर्ग सीमेवर सतर्क ओंकार हत्ती आज दिवसभर नेतर्डे परिसरात ठाण मांडून असल्याने गोवा

सात वर्षांच्या बांधकामांनंतर खड्डेमय ‘पलावा’चे उद्घाटन

७२ कोटींच्या खर्चानंतरही उड्डाणपुलाला ‘निसरडा भागा’ची उपमा मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील कल्याण-शीळ

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

अमेरिका रशियावर कठोर निर्बंध लादणार

नाटोला चीनवर ५० ते १०० टक्के टॅरिफ लादण्याची मागणी वॉशिंग्टन डीसी (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे