Paris olympic 2024: महिलांची जोडी मिळवून देऊ शकते भारताला पदक

  70

पॅरिस: पॅरिस ऑलिम्पिक २०२४मध्ये भारताला आतापर्यंत दोन पदके मिळाली आहेत. दोन्ही पदके ही नेमबाजीत मिळाली आहेत. भारतीय नेमबाज चांगली कामगिरी करत आहेत. भारताला दोन्ही पदके जिंकून देण्यात महिला नेमबाज मनू भाकर हिचे महत्त्वाचे योगदान ठरले.


पहिले पदक मनूने १० मीटर एअर पिस्टोल एकेरीमध्ये जिंकले होते. त्यानंतर भारताला दुसरे पदर १० मीटर एअर पिस्टोल मिश्रमध्ये मिळवून दिले. यात मनू भाकर आणि सरबजोत सिंह यांनी पदक जिंकले. दुसरे पदक ऑलिम्पिकच्या चौथ्या दिवशी आले. आज पाचव्या दिवशी भारताच्या खात्यात आणखी एक पदक येऊ शकते.


पाचव्या दिवशी हे पदक नेमबाजीत मिळू शकते. महिलांची जोडी हे पदक भारताला मिळवून देऊ शकते. आज भारताला राजेश्वरी कुमारी आणि श्रेयसी सिंह यांची जोडी पदक मिळवून देऊ शकते. जर दोघांच्या जोडीने नेमबाजीत महिला ट्रॅप फायनलसाठी क्वालिफाय केले तर पदक मिळण्याच्या आशा वाढतात.


याशिवाय इतर भारतीय खेळाडू विविध खेळांमध्ये अॅक्शनमध्ये दिसतील. जसे तिरंदाजी, बॅडमिंटन, रोईंग, बॉक्सिंग इत्यादींमध्ये पीव्ही सिंधू, लवलीना बोरगोहेन आणि लक्ष्य सेनसारखे अनेक स्टार्स मैदानावर उतरतील.

Comments
Add Comment

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण