Mumbai News : संतापजनक! ५ वर्षीय चिमुकलीवर शेजाऱ्याकडून अत्याचार

  464

शिवडी : सध्या देशभरात उरणमधील यशश्री प्रकरण चर्चेत असताना मुंबईतून (Mumbai Crime) एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुंबईतील शिवडी (Sewri) परिसरातील एका ३० वर्षीय नराधमाने चिमुकलीवर अत्याचार केल्याचे संतापजनक कृत्य उघडकीस आले आहे. याप्रकरणी नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. परंतु या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, शिवडी येथे ३० वर्षीय नराधमानेच ५ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. ही चिमुकली आवारात खेळत असताना शेजारी राहणाऱ्या इसमाने तिला उचलून स्वत:च्या घरी नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार केला. दरम्यान लहान मुलीची विचारपूस केली असता हे प्रकरण उघडकीस आले.


या प्रकरणी आरएके मार्ग पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ६५(२) आणि पोक्सो कायद्याअंतर्गत आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र या अत्याचाराच्या घटनेने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. त्याचबरोबर आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

'अन्नपदार्थांच्या पॅकिंगसाठी वर्तमानपत्राच्या कागद वापरु नका '

अन्न व औषध प्रशासनाची सूचना मुंबई : अन्नपदार्थ ग्राहकांना देताना त्याच्या पॅकिंगसाठी वर्तमानपत्राचा वापर करू

परळच्या उड्डाणपुलाची लवकरच दुरुस्ती होणार!

मुंबई : 'बृहन्मुंबई महानगरपालिका' पावसाळ्यानंतर परळ 'टीटी ब्रिज' उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात दुरुस्ती आणि

पालिकेच्या भाभा रुग्णालयात १३ 'बोगस' तंत्रज्ञ!

मुंबई : एका माहितीच्या अधिकाराच्या प्रश्नातून असे उघड झाले आहे की, मुंबईतील भाभा रुग्णालयात १३ 'बोगस' प्रयोगशाळा

आता मुंबईतही भटक्या कुत्र्यांची तक्रार तीन वेळा घेतली जाणार!

अखेर पालिका प्रशासनाला जाग! मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने आता भटक्या कुत्र्यांच्या तक्रारींवर आठवड्यातून

स्वातंत्र्यदिनी मांसाहार विक्री बंदीवरून आदित्य आणि जितेंद्र आव्हाडांची पुराव्यासकट भाजपने केली बोलती बंद!

तेव्हा जिभेवर कुलूप, तोंड उघडण्यापूर्वी निर्णय वाचून घ्या; भाजप नेते नवनाथ बन यांचे आदित्य ठाकरे आणि जितेंद्र

IAS Transferred: राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच राज्यातील सात बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच राज्यातील सात बड्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.