Mumbai Local : तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेसेवा विस्कळीत! प्रवाशांचा खोळंबा

मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाणारी लोकलबाबत (Mumbai Local) मुंबईकरांना काही दिवसांपासून मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या (Central Railway) रुळावर पाणी साचल्यामुळे, ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे तर कधी सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेसेवेला फटका बसतो. या कारणांमुळे अनेक रेल्वे गाड्या उशिराने धावतात, त्यामुळे अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. अशातच आजही सकाळी पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावरील तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे लोकलसेवा विलंबित झाल्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह इतर प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. पश्चिम मार्गावरील चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या विरार जलद गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असल्याने रेल्वेस्थानकावर मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाल्यामुळे सततच्या रेल्वेबाबत सततच्या होणाऱ्या बिघाडामुळे प्रवाशांनी चांगलाच संताप व्यक्त केला. दरम्यान, सध्या रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Comments
Add Comment

रितू तावडे मुंबईच्या आठव्या महिला महापौर

मुंबई: मुंबई महापालिकेच्या इतिहासात १९५५ पासून ते २०१७ या कालावधीत ७ महिला नगरसेविका महापौर झाल्या आहेत. १९५५ -५६

Mumbai: परदेशात उच्च शिक्षणाच्या नावाखाली मोठी फसवणूक, आरोपी फरार

मुंबई : मुंबईत परदेशात उच्च शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आणि पालकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक

अजित पवारांचे विमान लँड करण्याचा निर्णय वैमानिकाचा, की कोणी ‘कमांड’ दिली?

 तपासात नवा ट्वीस्ट; दृष्यमानता कमी असतानाही परवानगी कशी मिळाली, या दिशेने तपास सुरू मुंबई : राज्याचे दिवंगत

Mumbai Local : पहिला बुरखा परिधान करून महिलांच्या डब्यात प्रवेश, नंतर अनेकींना घाणेरडा स्पर्श अन् संशय येताच चालत्या ट्रेनमधून पसार!

मुंबई : मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. एका धावत्या

काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाचे विभाजन

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल; गडचिरोलीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा मुंबई : “काँग्रेसच्या

Pune: दहावी-बारावी परीक्षेआधी पुणे प्रशासन ॲक्शन मोडवर; नियमांचे पालन न केल्यास होणार कडक कारवाई

पुणे: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात सर्वत्र परीक्षांचे वारे वाहू लागणार आहेत. बारावीच्या परीक्षा १०