Mumbai Local : तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेसेवा विस्कळीत! प्रवाशांचा खोळंबा

मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाणारी लोकलबाबत (Mumbai Local) मुंबईकरांना काही दिवसांपासून मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या (Central Railway) रुळावर पाणी साचल्यामुळे, ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे तर कधी सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेसेवेला फटका बसतो. या कारणांमुळे अनेक रेल्वे गाड्या उशिराने धावतात, त्यामुळे अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. अशातच आजही सकाळी पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावरील तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे लोकलसेवा विलंबित झाल्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह इतर प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. पश्चिम मार्गावरील चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या विरार जलद गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असल्याने रेल्वेस्थानकावर मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाल्यामुळे सततच्या रेल्वेबाबत सततच्या होणाऱ्या बिघाडामुळे प्रवाशांनी चांगलाच संताप व्यक्त केला. दरम्यान, सध्या रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.