Mumbai Local : तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेसेवा विस्कळीत! प्रवाशांचा खोळंबा

  118

मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाणारी लोकलबाबत (Mumbai Local) मुंबईकरांना काही दिवसांपासून मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या (Central Railway) रुळावर पाणी साचल्यामुळे, ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे तर कधी सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेसेवेला फटका बसतो. या कारणांमुळे अनेक रेल्वे गाड्या उशिराने धावतात, त्यामुळे अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. अशातच आजही सकाळी पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावरील तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे लोकलसेवा विलंबित झाल्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह इतर प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. पश्चिम मार्गावरील चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या विरार जलद गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असल्याने रेल्वेस्थानकावर मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाल्यामुळे सततच्या रेल्वेबाबत सततच्या होणाऱ्या बिघाडामुळे प्रवाशांनी चांगलाच संताप व्यक्त केला. दरम्यान, सध्या रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Comments
Add Comment

उद्धव ठाकरे आणि आव्हाडांच्या भूमिकेवर भाजपचा सवाल

हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल

Housing Jihad: धक्कादायक! हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांसोबत डिनर करणाऱ्या उबाठावर संजय निरुपम यांचा घणाघात मुंबई: पश्चिम

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी: मंत्री मंगलप्रभात लोढा

जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईत ५१ कबुतरखाने बंद... पक्ष्यांना खायला घालण्यास पूर्णपणे बंदी! आतापर्यंत १०० जणांहून अधिक लोकांना ठोठावला दंड

मुंबई: कबुतरांना खायला देण्यावरील बंदी लागू झाल्यापासून, बीएमसीने दादर कबुतरखान्यात १०० हून अधिक लोकांना दंड