झारखंड: झारखंडच्या चक्रधरपूर रेल्वे मंडळाच्या बाराबम्बो रेल्वे स्टेशनजवळ हावडा-मुंबई मेल एक्सप्रेसला अपघात झाला. रेल्वेचे १८ डबे रूळावरून घसरले. दरम्यान, या अपघातात ६ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी रेल्वे कर्मचाऱ्यांसोबत एआरएम, एडीआरएम आणि सीकेपीच्या टीम पोहोचल्या आहेत. जखमींना तातडीने रेस्क्यू केले जात आहे.
घटनेला दुजोरा देताना अधिकाऱ्याने सांगितले की १२८१० हावडा-सीएसएमटी एक्सप्रेस सकाळी पावणेचारच्या सुमारास चक्रधरपूर डिव्हीजनचे राजखरसवा वेस्ट आऊट आणि बाराबम्बो या दरम्यान चक्रधरपूरजवळ १८ डबे रूळावरून घसरल्याची सूचना मिळाली होती.
SER च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, मुंबई-हावडा मेलचे अनेक डब्बे बाराबम्बोच्या जवळ पटरीवर उतरले. या अपघातात सहा प्रवासी जखमी झालेत. त्यांच्यावर बाराबम्बोमध्ये प्राथमिक उपचार दिले जात आहेत.
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…