झारखंडमध्ये मोठा रेल्वे अपघात, हावडा-मुंबई मेलचे १८ डबे रूळावरून घसरले

  137

झारखंड: झारखंडच्या चक्रधरपूर रेल्वे मंडळाच्या बाराबम्बो रेल्वे स्टेशनजवळ हावडा-मुंबई मेल एक्सप्रेसला अपघात झाला. रेल्वेचे १८ डबे रूळावरून घसरले. दरम्यान, या अपघातात ६ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी रेल्वे कर्मचाऱ्यांसोबत एआरएम, एडीआरएम आणि सीकेपीच्या टीम पोहोचल्या आहेत. जखमींना तातडीने रेस्क्यू केले जात आहे.

घटनेला दुजोरा देताना अधिकाऱ्याने सांगितले की १२८१० हावडा-सीएसएमटी एक्सप्रेस सकाळी पावणेचारच्या सुमारास चक्रधरपूर डिव्हीजनचे राजखरसवा वेस्ट आऊट आणि बाराबम्बो या दरम्यान चक्रधरपूरजवळ १८ डबे रूळावरून घसरल्याची सूचना मिळाली होती.

 



SER च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, मुंबई-हावडा मेलचे अनेक डब्बे बाराबम्बोच्या जवळ पटरीवर उतरले. या अपघातात सहा प्रवासी जखमी झालेत. त्यांच्यावर बाराबम्बोमध्ये प्राथमिक उपचार दिले जात आहेत.
Comments
Add Comment

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या

भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरुच

पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विचारमंथन सुरू नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय

टोल कर्मचाऱ्यांची दादागिरी... ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानाला मारहाण केल्याप्रकरणी NHAI ची मोठी कारवाई

मेरठ: ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी NHAI ने मोठी कारवाई केली असून संबंधित

कर्नाटकचे काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र यांना ईडीकडून अटक

छापेमारीत आढळले १२ कोटी रुपये, ६ कोटींचे सोने गंगटोक : कर्नाटक काँग्रेसचे आमदार के. सी. वीरेंद्र यांना सक्तवसुली

टिकटॉकवरील बंदी उठवली काय?

नवी दिल्ली : एकेकाळी तरुणाईला वेड लावणाऱ्या टिकटॉकच्या भारतातील पुनरागमनाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला

Vande Bharat Express: रेल्वेने वंदे भारत ट्रेनच्या वेळापत्रकात केला बदल, जाणून घ्या आता सेमी हाय स्पीड ट्रेन किती वाजता धावणार?

नवी दिल्ली: वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची सर्वात प्रतिष्ठित आणि आरामदायी ट्रेन मानली जाते, ज्यामध्ये