मुंबई, ठाण्यात पावसाची उसंत, पाहा राज्यात काय आहे पावसाची स्थिती

मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाचा कहर सुरू आहे. मुसळधार पावसामुळे तर पुण्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली. बुधवारी तसेच गुरूवारीही पावसाचा जोर कायम राहिल्याने राज्यातील पुणे, ठाणे, मुंबईमध्ये जनजीवन अक्षरश: विस्कळीत झालं होतं. गेल्या ४८ तासांत पावसामुळे ५ जणांना आपला जीव गमवावा लागला.


पुण्यात पावसाने कहरच केला. धो धो कोसळणाऱ्या पावसाने पुण्यातील अनेक नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली. त्यामुळे पुणे शहर तसेच पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.यामुळे पुणेकरांचे बेहाल केले. अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने लोकांना स्थलांतरावाचून काही पर्यायच उरला नाही.


दरम्यान, मुंबईत गुरूवारी रात्रीपासून पावसाने थोडी उसंत घेतली आहे. हवामान विभागाने शुक्रवारी ठाणे तसेच मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर केली होती. पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आळा आहे. तर रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.



पावसाची विश्रांती मात्र लोकलसेवा उशिराने


शुक्रवारी पावसाने विश्रांती घेतली असली तरी लोकलसेवा उशिराने सुरू आहे. मध्य, पश्चिम तसेच हार्बर रेल्वेच्या प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. अनेक रेल्वेगाड्या उशिराने सुरू असल्याने प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची मोठी गर्दी दिसत आहे.

मुंबईसाठी गुड न्यूज


सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी ४ धरणे पूर्णपणे भरली आहेत. त्यामुळे मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणे विहार, मोडक सागर, तुळशी आणि तानसा हे तलावही ओसंडून वाहत आहेत

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार मुंबई : "राज्य विधिमंडळाचे सोमवारपासून

Kolhapur : कोल्हापुरात नवीन उद्योगांना बळ

 ४७.६३ हेक्टर शासकीय गायरान जमीन एमआयडीसीला; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ

Pandarpur Mandir : पंढरपूर मंदिरातील लेपन प्रक्रियेवरील स्थगिती अर्ज न्यायालयाने नाकारला

सोलापूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींवर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्यानुसार करण्यात येणाऱ्या लेपन

Monsoon Delay : जिल्ह्यात ३० जूनपर्यंत जलतरण तलाव बंद

अलिबाग : जिल्ह्यातील उष्ण व दमट हवामान, मान्सूनच्या आगमनास झालेला विलंब, कमी पर्जन्यमान आणि उपलब्ध जलसाठ्यातील

Parbhani Temple Collapse : परभणीत भीषण दुर्घटना; मंदिरातील बांधकामाचा भाग कोसळून 7 भाविकांचा मृत्यू

परभणी : महाराष्ट्रातील परभणी (Parbhani) जिल्ह्यातील यशवाडी देवस्थान हनुमान मंदिरात शनिवारी मोठी दुर्घटना घडली. मंदिर

Pune Crime : किरकोळ वादाचे हिंसक रूपांतर; पुण्यात गुंडाकडून हल्ल्याचा प्रयत्न

Pune Crime : पुणे :  पुण्यातील (Pune) पाटील इस्टेट परिसरात एका किरकोळ वादातून मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. गाडी