Sangli news : सांगलीतल्या पूरस्थितीमुळे कारागृहातील कैद्यांना कोल्हापूरमध्ये हलवलं

२० महिला आणि ६० पुरुष अशा ८० कैद्यांचा समावेश


कोल्हापूर : काल राज्यभरात पावसाने धुमाकूळ (Heavy Rain) घातला. पुण्यात (Pune) पुराचा धोका निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झालं. तर आता सांगलीमध्येही (Sangli) पुराचा धोका उद्भवला आहे. सांगली, कोल्हापूरमध्ये (Kolhapur) मुसळधार पावसामुळे नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. यामुळे सांगलीतील जिल्हा कारागृहातील कैद्यांना कोल्हापुरातील कळंबा जेलमध्ये हलवण्यात आलं आहे. यामध्ये २० महिला कैदी आणि ६० पुरुष कैदी अशा ८० कैद्यांचा समावेश आहे.


सांगली कारागृह अधीक्षक महादेव होरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली जिल्हा कारागृहाने संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. ४५ फूटांच्या आसपास पाणी गेल्यानंतर कारागृहात पाणी जाण्यास सुरूवात होते. कृष्णा नदीची पाणी पातळी लक्षात घेऊन आणखी काही कैद्यांना हलवले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय कारागृहातील अन्न धान्य , कागदपत्रे, शास्रात्रे, दारुगोळा सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेला आहे.


महादेव होरे म्हणाले की, सांगली जिल्हा कारागृह संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. पूरस्थिती निर्माण झाल्यास आवश्क तो अन्नधान्यसाठा आणि इतर वस्तूंचा साठा करून ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर कारागृहातील संगणक कक्ष, कागदपत्रे सर्व गोष्टी पाणी पोहोचणार नाही अशा ठिकाणी ठेवण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

Maharashtra wedding card new rule : लग्न ठरलंय? मग हा नवा नियम जाणून घ्या; पत्रिकेत द्यावी लागणार 'ही' महत्त्वाची माहिती

बालविवाह रोखण्यासाठी सरकारचा नवा फॉर्म्युला; लग्नपत्रिकेत होणार मोठा बदल महाराष्ट्रात बालविवाह (Child Marriage)

Vishawas Nangare Patil : नागपूरच्या पोलीस दलात मोठे बदल; विश्वास नांगरे पाटील नवे CP

नागपूर : महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलात महत्त्वाच्या बदलांची घोषणा करण्यात आली असून वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकारी

Kolhapur Shaken : माजी महापौरांच्या १७ वर्षीय नातवाची आत्महत्या; परिसरात शोककळा

कोल्हापूर: कोल्हापुरातील जुना बुधवार पेठ, सोन्या मारुती चौक परिसरात एका १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने

Weather Update : महाराष्ट्रासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे ! राज्यातील 3० जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच मान्सूनचे आगमन होणार ?

Mumbai : मुंबईसह राज्यातील काही भागात मंगळवारी (२३ जून ) ला पावसानी हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या

Nitesh Rane : ओसरगाव टोलनाक्यावर 'एमएच-०७' वाहनांना टोलमाफी

 पालकमंत्री नितेश राणे यांची वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना मोठी भेट; स्वतंत्र मार्गिका, व्यावसायिक

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; पती-पत्नी ठार, दोन चिमुकल्यांसह चालक गंभीर

Buldhana : राज्यात रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) पुन्हा एकदा