Ginger Tea: पावसाळ्यात प्या हा इम्युनिटी बूस्टर चहा, आजार होतील दूर

मुंबई: आल्याचा चहा हा इम्युनिटी बूस्टर मानला जातो. आयुर्वेदातही याचे अनेक फायदे सांगितले आहेत. जर तुम्हाला पावसाळ्याच्या दिवसांत हा चहा पित असाल तर यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. तसेच आजारही तुमच्यापासून दूर पळतील.


पावसामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याचा धोका असतो.यामुळे पोट, त्वचा तसेच गळ्यामध्ये इन्फेक्शन वाढते. पावसाळ्याच्या दिवसांत वारंवार सर्दी खोकल्याचाही त्रास होत असतो. घश्याचा त्रास तर अनेकांना सातत्याने होतो. मात्र रोगप्रतिकारक शक्ती तंदुरुस्त असेल तर हा त्रास होत नाही.


अशातच पावसाळ्याच्या दिवसांत आयुर्वेद इम्युनिटी बूस्टर आले आणि मुलेठीचा चहा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. आले आणि मुलेठी हे इन्फेक्शन दूर करण्याचे काम करतात. यामुळे रोगप्रतिकार क्षमता मजबूत होते. गळ्याची खवखव दूर करण्यासीठी आल्याचा वापर केला जातो.


आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लामेंटरी गुण असतात ज्यामुळे सर्दी तसेच फ्लूचा धोका टळतो. जिंजरॉलमध्ये एनाल्जेसिक, अँटी बॅक्टेरियल आणि इन्फेक्शनमुळे होणारा ताप दूर करण्याचे गुण असतात.


मुलेठीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडंट असतात ज्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते.

Comments
Add Comment

उत्तम आरोग्यासाठी पोटाकडे लक्ष द्या..

पोटाचे आरोग्य उत्तम असेल तर आपलं पूर्ण शरीर निरोगी राहतं. पोटाचं आरोग्य सांभाळण्यासाठी आतड्याचे स्वच्छ राहणे,

Hair Care: केस गळती थांबवण्यासाठी 'या' ५ बियांचे सेवन करा, नैसर्गिकरित्या केस वाढतील

मुंबई : आजकाल बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे केस गळण्याची समस्या खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत, केसांचे

योगाचे प्रकार

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके मागील लेखात पातंजल-योगाव्यतिरिक्त योगाच्या इतर प्रकारांपैकी हठयोगाविषयी माहिती

Health: सकाळी, दुपारी की रात्री? ड्रायफ्रुट्स खाण्याची योग्य वेळ कोणती, घ्या जाणून...

मुंबई: सुका मेवा (Dry fruits) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु तो कोणत्या वेळी खावा, हे जाणून घेणे महत्त्वाचे

उष्ण पदार्थांचे अति सेवन : उच्च रक्तदाब आणि त्वचेच्या समस्यांचे प्रमुख कारण !

मुंबई : आयुर्वेद हा भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये शरीराच्या संतुलनावर विशेष

साथींच्या आजारापासून मुलांना दूर ठेवा

विनायक बेटावदकर गणपती उत्सवापूर्वी सुमारे पंधरा दिवस, गणपती उत्सवात कल्याण शहर, ग्रामीण भागाचे हवामान साधारण