SSC HSC Exam : पावसामुळे परीक्षा केंद्रावर पोहोचू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी!

दहावी बारावी विद्यार्थ्यांना मिळणार दुसरी संधी; महाराष्ट्र शिक्षण मंडळाचा निर्णय


मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात काल रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. सध्या संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. एकीकडे पावसामुळे वाहतूक सेवा विस्कळीत झाल्यामुळे चांगलीच तारांबळ उडत आहे तर दुसरीकडे या पावसाचा फटका विद्यार्थ्यांच्या परीक्षेलाही बसला असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक विद्यार्थी वेळेत पुरवणी परीक्षा देण्यासाठी पोहोचू न शकल्याने शिक्षण मंडळाने दहावी- बारावीच्या पुरवणी परीक्षेसंदर्भात एक निर्णय घेतला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा पुरवणी परीक्षेचे आयोजन केले होते. परंतु राज्यभरात पावसाने थैमान घातल्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. मात्र अशा विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षा देण्याची आणखी एक संधी मिळणार असल्याची घोषणा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याकडून करण्यात आली आहे.


त्याचबरोबर राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे परिस्थितीचा आढावा घेऊन दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षेचा दुपारी तीन वाजता होणारा पेपर रद्द करण्याचा निर्णय जाहीर करु, अशी माहिती गोसावी यांनी दिली आहे.



उद्याचा पेपरही रद्द


पावसाचा जोर आणखी काही दिवस असाच कायम राहणार असल्यामुळे दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांचा उद्या होणारा पेपरदेखील रद्द करु, असे शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Vande Bharat : पुण्यात वंदे भारतचा डबा घसरला

पुणे : पुणे स्टेशनजवळ संध्याकाळी २२२२५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा चौथा डबा

Land Scam : अमरावती भूखंड घोटाळ्याची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी

मुंबई : अमरावती शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षित असलेले भूखंड अन्य व्यक्तींना बेकायदेशीरपणे

Agriculture Minister Dattatray Bharne : "बोगस बियाणे ओळखण्यासाठी बियाण्यांची डीएनए फिंगर प्रिंट टेस्ट केली जाणार" : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

"बियाण्यांची डिजिटल नोंद ठेवण्यासाठी ‘साथी’ पोर्टलचा वापर बंधनकारक : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बियाणे उत्पादक

लक्ष द्या ! लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख टाकणे अनिवार्य होणार ? नेमकी शिफारस काय ?

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे , दोन कुटुंबाचे मिलन. पण वयोमर्यादा अपूर्ण असली तरी अनेक लग्न होतात, अर्थात बालविवाह

Crime : पत्नीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, मित्रावर संशय गेला; पारा चढला अन मित्रानंच मित्राचा काटा काढला

Beed Crime : बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचं चित्र आहे. बीडमध्ये मैत्रीला काळिमा

Pratap Sarnaik : रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी बंधनकारकच; परिवहन मंत्र्यांची ठाम भूमिका; आजच्या बैठकीत काय घडलं ?

(Marathi Language Compulsory Taxi-Auto ) : आगामी 1 मे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य