SSC HSC Exam : पावसामुळे परीक्षा केंद्रावर पोहोचू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी!

दहावी बारावी विद्यार्थ्यांना मिळणार दुसरी संधी; महाराष्ट्र शिक्षण मंडळाचा निर्णय


मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात काल रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. सध्या संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. एकीकडे पावसामुळे वाहतूक सेवा विस्कळीत झाल्यामुळे चांगलीच तारांबळ उडत आहे तर दुसरीकडे या पावसाचा फटका विद्यार्थ्यांच्या परीक्षेलाही बसला असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक विद्यार्थी वेळेत पुरवणी परीक्षा देण्यासाठी पोहोचू न शकल्याने शिक्षण मंडळाने दहावी- बारावीच्या पुरवणी परीक्षेसंदर्भात एक निर्णय घेतला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा पुरवणी परीक्षेचे आयोजन केले होते. परंतु राज्यभरात पावसाने थैमान घातल्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. मात्र अशा विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षा देण्याची आणखी एक संधी मिळणार असल्याची घोषणा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याकडून करण्यात आली आहे.


त्याचबरोबर राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे परिस्थितीचा आढावा घेऊन दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षेचा दुपारी तीन वाजता होणारा पेपर रद्द करण्याचा निर्णय जाहीर करु, अशी माहिती गोसावी यांनी दिली आहे.



उद्याचा पेपरही रद्द


पावसाचा जोर आणखी काही दिवस असाच कायम राहणार असल्यामुळे दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांचा उद्या होणारा पेपरदेखील रद्द करु, असे शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

मुंबई लोकलमध्ये नियम कडक; मासिक पाससाठी लागू होणार 'हे' कडक नियम

मुंबई : लोकलमध्ये विनातिकिट किंवा बनावट तिकिटांचा वापर करुन प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी रेल्वे

सिडको घरांच्या किंमतीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी; 'हे चालणार नाही, गरिबांसाठी ती घरं आहेत' बैठकीत स्पष्ट निर्देश

नागपूर: सिडको अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांच्या किंमतींमध्ये केलेल्या मोठ्या वाढीवरून निर्माण झालेल्या

जमिनीच्या अकृषिक वापरानंतर आता ‘सनद’ची अटही रद्द!

नागपूर : राज्यातील जमीन महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

मालवणीत २०१० नंतर विशिष्ट धर्मियांची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६ टक्क्यांपर्यंत कशी वाढली? - मंत्री मंगल प्रभात लोढा यांता काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना सवाल

नागपूर : मुंबईतील मालाड-मालवणी भागात गेल्या १४ वर्षांत एका विशिष्ट समाजाची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६

चालान न भरणाऱ्या वाहनांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात मोठी घोषणा

नागपूर: महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. आजच्या कामकाजात विधान परिषदेत नियम

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ ते समाधी स्थळापर्यंतनवीन रस्ता निर्मितीस मान्यता

तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास आराखड्यात ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेण्यात याव्यात - मुख्यमंत्री