SSC HSC Exam : पावसामुळे परीक्षा केंद्रावर पोहोचू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी!

दहावी बारावी विद्यार्थ्यांना मिळणार दुसरी संधी; महाराष्ट्र शिक्षण मंडळाचा निर्णय


मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात काल रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. सध्या संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. एकीकडे पावसामुळे वाहतूक सेवा विस्कळीत झाल्यामुळे चांगलीच तारांबळ उडत आहे तर दुसरीकडे या पावसाचा फटका विद्यार्थ्यांच्या परीक्षेलाही बसला असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक विद्यार्थी वेळेत पुरवणी परीक्षा देण्यासाठी पोहोचू न शकल्याने शिक्षण मंडळाने दहावी- बारावीच्या पुरवणी परीक्षेसंदर्भात एक निर्णय घेतला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा पुरवणी परीक्षेचे आयोजन केले होते. परंतु राज्यभरात पावसाने थैमान घातल्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. मात्र अशा विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षा देण्याची आणखी एक संधी मिळणार असल्याची घोषणा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याकडून करण्यात आली आहे.


त्याचबरोबर राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे परिस्थितीचा आढावा घेऊन दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षेचा दुपारी तीन वाजता होणारा पेपर रद्द करण्याचा निर्णय जाहीर करु, अशी माहिती गोसावी यांनी दिली आहे.



उद्याचा पेपरही रद्द


पावसाचा जोर आणखी काही दिवस असाच कायम राहणार असल्यामुळे दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांचा उद्या होणारा पेपरदेखील रद्द करु, असे शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Sunil Tatkare: 'हा फक्त एक उमेदवारी अर्ज नाही, तर अजितदादांनी निवडलेल्या विकासाच्या वाटेवर पुढे जाण्याचा निर्धार'

बारामती: राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी आज बारामती विधानसभा

Nagpur Crime : नागपूर हादरलं! पैशांसाठी १४ वर्षीय मित्राची निघृण हत्या

नागपूर : नागपूर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय मुलाच्या अपहरण आणि

बिनविरोध नसला तरी सुनेत्राताईंना विक्रमी विजय मिळवा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बारामतीकरांना आवाहन

बारामती: महाराष्ट्राच्या जडणघडणीत माजी मुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या

Gautami Patil : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलनं दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

नाशिक : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे दिवसेंदिवस अनेक काळे कारनामे समोर येत असून महिला लैंगिक शोषण, आर्थिक

नागपूरकरांवर पाणीसंकट; सलग २ दिवस या भागात राहणार पाणी पुरवठा बंद

नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन नागपूर : नागपूर शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

Baramati By Election : सुनेत्रा ताईंचा फोन आला अन्...बारामती पोटनिवडणुकीबाबत लक्ष्मण हाकेंचा मोठा निर्णय

बारामती : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही, याबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू