Independence Day Offer 2024: रिचार्ज प्लान्स महाग केल्यानंतर जिओने आणली शानदार ऑफर, वाचतील १००० रूपये

मुंबई: रिलायन्स जिओ आपल्या युजर्सला विविध शानदार ऑफर्स देत असतात. दरम्यान, नुकत्याच जिओने आपल्या मोबाईल रिचार्ज प्लान्सची किंमत वाढ केला आहे. आता या कंपनीने युजर्ससाठी एक खास ऑफर सादर केली आहे.


कंपनीने ही ऑफर स्वातंत्र्यदिनानिमित्त सादर केली आहे. १५ ऑगस्टच्या दिवशी भारत आपला ७८वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. टेलिकॉम सेक्टरमधील अनेक कंपन्या या निमित्ताने सर्व देशवासियांसाठी खास काहीतरी घेऊन येत आहेत. त्यातच रिलायन्स जिओनेही काही खास ऑफर आणली आहे.



१००० रूपयांची सूट


रिलायन्स जिओने ७८व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त एअरफायबर सर्व्हिसच्या युजर्ससाठी आणखी एक ऑफर सादर केली. या ऑफरअंतर्गत जिओच्या एअरफायबर ब्रॉडबँड कनेक्शन लावणारे लोक १००० रूपयांची बचत करू शकतात.


खरंतर, तुम्ही रिलायन्स जिओचे नवे एअरफायबर कनेक्शन लावले तर तुम्हाला १००० रूपयांचे अतिरिक्त इन्स्टॉलेशन चार्ज द्यावे लागतात. मात्र स्वातंत्र्यदिनी कंपनीने नव्या युजर्ससाठी फ्रीमध्ये एअरफायबर कनेक्शन इन्स्टॉल करण्याची ऑफर दिली आहे.

Comments
Add Comment

Cooperative Building : सहकार भवनांच्या बांधकामास गती; नियोजित वेळेत पूर्णत्वासाठी प्रयत्न

मुंबई : राज्यातील सहकार भवन व सहकार संकुलांच्या बांधकाम कामांचा आढावा घेण्यासाठी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

fertilizer : 'उत्तरप्रदेशच्या धर्तीवर राज्यातही खते लीकिंग बंद करणेबाबत निर्णय घेणार'

मुंबई : ज्या कंपन्यांकडून अनुदानित खते विक्रीचा अधिकार देण्यात आलेला आहे, त्यांना विनाअनुदानित खते व कृषी

sand mining : अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी सागरी मंडळाचे अधिकार वाढवले

मुंबई : राज्यातील नद्या आणि खाडीपात्रांतील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी राज्य सरकारने 'वाळू धोरण २०२५' मध्ये

Criminal Public Representatives : गुन्हेगार लोकप्रतिनिधींना सन्मानाची गरज नाही!

मुंबई : विधानमंडळ किंवा संसदेचे सदस्य (आमदार, खासदार) शासकीय कार्यालयात आल्यावर त्यांना उभे राहून अभिवादन

Pandharpur विठ्ठल मंदिर समितीच्या गोशाळेच्या विस्ताराचा मार्ग मोकळा

मुंबई : पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या गोशाळा विस्तारासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित

Summer Vacation : शाळा सुटली, उन्हाळी सुट्टी जाहीर

मुंबई : राज्यातील उकाड्याचे प्रमाण वाढले आहे. या वाढलेल्या तापमानात विद्यार्थी शाळेत येण्याच्या निमित्ताने