मुंबई: मुंबईचे हवामान पाहता पोलिसांनी लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. मुंबई पोलिसांनी म्हटले की हवामान विभागाने शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. अशातच मुंबईकरांसाठी आवाहन आहे की गरज असेल तर घराबाहेर पडा. नाहीतर घरातच राहा. तसेच कोणत्याही प्रकारच्या आपातकालीन मदतीसाठी १०० अथवा १०२ डायल करून संपर्क करण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.
मुसळधार पावसामुळे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी सकाळी चार वाजल्यापासून ते दुपारी १ वाजेपर्यंत मुंबईतील अनेक भागांमध्ये १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. पीटीआयच्या माहितीनुसार या दरम्यान अधेरीच्या मालपा डोंगरी क्षेत्रात सर्वाधिक १५७ मिमी पावसाची नोंद झाली.
हवामान विभागाने पुढील २४ तासांत सकाळी आठ वाजल्यापासून शहर तसेच उपनगरांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…