Mumbai Rain : मुंबईसह उपनगरात मुसळधार! रेल्वे वाहतूक खोळंबली; प्रवाशांचे हाल

मुंबई : काल दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने आज पहाटेपासून चांगलाच (Mumbai Rain) जोर धरला आहे. मुंबईसह उपनगरात पावसाच्या सरी (Heavy Rain) कोसळत असल्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांना पाण्यात वाट शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्याचबरोबर मुसळधार पावसाचा फटका मुंबईची लाईफलाइन मानली जाणाऱ्या लोकल (Railway) सेवेवरही पडला आहे. तिन्ही मार्गांवरील लोकल वाहतूक संथ गतीने सुरु असल्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह इतर प्रवाशांचे देखील हाल होताना दिसून येत आहेत.



तिन्ही रेल्वे मार्गावर परिणाम


मुंबईतील मुसळधार पावसाचा परिणाम तिन्ही मार्गांवरील लोकल वाहतुकीवरही झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिराने, पश्चिम रेल्वेवरील लोकल गाड्या ५ ते १० मिनिटे विलंबाने, तर हार्बर रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहे.



मुंबईला यलो अलर्ट


मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरु असून पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, वसई, विरार यासोबत दादर, माटुंगा, सायन, कुर्ला, वांद्रे, गोरेगाव, बोरीवली येथे पावसाची संततधार कोसळत असल्यामुळे सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हवामान विभागाने मुंबईला आज यलो अलर्ट दिला आहे.

Comments
Add Comment

BMC : महापालिकेच्या वाहन कंत्राटावर संशयाची सावली

‘आधी ऑडिट करा, मगच पैसे द्या’ सहा महिन्यांच्या मुदतवाढीत आर्थिक विसंगतीचा भाजपचा आरोप स्थायी समितीत गाजला

Water hyacinth : पवई तलावातील जलपर्णी आता कायमची हद्दपार..

तलावाच्या विहार पथाचा विकास सी एस आर निधीतून.. मुंबई: मुंबई महापालिकेच्या पवई तलावात सांडपाण्याच्या

Devendra Fadnavis : बी.टी. सरांच्या निधनाने वैयक्तिक मार्गदर्शकाला मुकलो!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शोकसंवेदना मुंबई, माजी आमदार, शिक्षणतज्ञ आणि विविध सामाजिक प्रश्नांचे गाढे

Devendra Fadnavis : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद

'चेहरा पडताळणी पद्धती'द्वारेच प्रवेश; मुख्यमंत्र्यांपासून मंत्री आणि पीठासीन अधिकाऱ्यांसह सर्व घटकांसाठी

Shrikant Shinde : दोन दिवस वाट पहा, सगळं स्पष्ट होईल!

 'ऑपरेशन टायगर'वर खासदार श्रीकांत शिंदे यांची सूचक प्रतिक्रिया मुंबई : उबाठा गटाचे ६ खासदार फुटल्यानंतर

Pratap Sarnaik : बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

मुंबई, : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार बेस्ट कृती समितीच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेत