Nitesh Rane : संजय राऊत आणि त्याच्या मालकाच्या अकलेची किव येते!

आमदार नितेश राणे यांचा संजय राऊतसह उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल


मुंबई : काल मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प (Union Budget 2024) सादर केला. या अर्थसंकल्पाचे देशभराच्या कानाकोपऱ्यातून कौतूक होत असताना संजय राजाराम राऊत (Sanjay raut) यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत अर्थसंकल्पामुळे महाराष्ट्रावर अन्याय झाल्याचे म्हटले. तसेच देवेंद्र फडणवीस यांची अर्थसंकल्प समजण्याची कुवत आहे का, अशी टीका संजय राऊत यांनी केली. त्यांच्या या प्रतिक्रियेवर आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.


आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत संजय राऊत आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात 'मला बजेट मधलं काही येत नाही, गरीबाला गरीब करणारा आणि श्रीमंताला श्रीमंत करणारा बजेट ' अशी प्रतिक्रिया देशातील दिग्गज मंत्री आणि उद्योजकांसमोर दिली. त्यामुळे उद्धव ठाकरेसारख्या ढ मालकासोबत त्याचा कामगार म्हणजेच संजय राऊत यांच्या अकलेची किव येते. त्यांनी अर्थसंकल्पाबाबत काहीच न बोललेलं बरं असे नितेश राणे यांनी म्हटले.


त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पावर काढलेले पुस्तक संजय राऊत आणि त्याच्या मालकाने वेळ काढून वाचा. त्या पुस्तकात अर्थसंकल्प कशाला म्हणतात, त्यात काय मांडलं जात हे समजून तुमचं तुमचं तोंड अर्थसंकल्प विषयावर उघडा, अशी बोचरी टीका त्यांनी केली.



संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना नितेश राणे यांचे खुले आव्हान


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल अर्थसंकल्पाचे मुद्दे ऐकून नोंदवत असताना त्यांचा एक फोटो प्रकाशित झाला होता. त्या फोटोवर संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची अर्थसंकल्प समजण्याची कुवत आहे का, असा प्रश्न केला होता. त्यावर आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर केले की, मुंबईत एखादा हॉल घेऊन त्यामध्ये व्यासपीठावर बसलेले देवेंद्र साहेब आणि त्यांच्या समोर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी बसून कालचा झालेला बजेट आणि अर्थसंकल्प बाबत तुम्हाला काय कळलं हे मांडावं. हिंमत असेल तर आणि राजाराम राऊत यांचा पुत्र असल्यास हे आव्हान स्वीकार, असा इशारा नितेश राणे यांनी यावेळी दिला.



दुसऱ्यांच्या घरात नाक खुपसण्याचे संजय राऊत यांचे काम


सकाळच्या परिषदेत संजय राऊत यांनी अमित शहा यांच्या मनात फडणवीस साहेब नाहीत असा विषय काढला होता. त्यावर संजय राऊतांना दुसऱ्यांच्या घरात नाक खुपसण्याचं काम चांगलचं जमतं असे म्हटले. त्याचबरोबर अमित शहा यांच्या मनात काय आहे यांची चिंता सोडून उद्धव ठाकरे यांना त्यांच्या मनात मुख्यमंत्र्यांची जागा आदित्य ठाकरे की रश्मी ठाकरे हे विचारुन नक्की कर व त्यानंतर अमित शहा यांच्या मनात कोण आहे त्याचा शोध घे, असेही नितेश राणे यांनी डिवचले.



आचार्य महाविद्यालयाने घेतलेला निर्णय योग्यच


चेंबूरमधील आचार्य कॉलेजने हिजाबबंदी बाबत घेतलेल्या निर्णयावर अनेक विद्यार्थ्यांनी कॉलेज सोडले. यावर नितेश राणे यांनी म्हटले की, शाळेसह महाविद्यालयातही मुस्लिम समाज आणण्याचा हेतू आहे. हिंदु मुला-मुलींना लागू होणारे नियम मुस्लिम धर्मातील मुलांनीही पाळणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना धर्म आणि शिक्षण यातील कोणती गोष्ट महत्त्वाची वाटते ते लक्षात घेऊन तुमचा निर्णय घ्या, असे नितेश राणे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Nasik News: नामांकित शाळेत बॉम्ब असल्याचा धक्कादायक मेल, शाळा प्रशासनात खळबळ!

नाशिक: नाशिक शहरातील एका नामांकित शाळेला मध्यरात्री पावणे दोन वाजता थरकाप उडवणारा मेल प्राप्त झाला. या मेलमध्ये

अखेर Vantara आरोपमुक्त! न्यायालयातील विजयासह रिलायन्सकडून प्रतिकिया म्हणाले....' भारताच्या...

मोहित सोमण:आज अखेर रिलायन्स फाउंडेशनच्या 'वनतारा' या देशातील सर्वात मोठ्या प्राणी पुनर्वसन प्रकल्पाला (Rehabilitation Centre)

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

अरे बापरे ITR भरताना शेवटच्या दिवशीच वेबसाईट हँग? करदात्यांची तक्रार 'हे' उपाय करुन पहा

प्रतिनिधी:आज आयटीआर भरायचा शेवटचा दिवस आहे.सकाळपासूनच मात्र आयटीआर संकेतस्थळावरील करदात्यांना तांत्रिक