Bank Job : बँकेत काम करण्याची सुवर्णसंधी! तब्बल ६ हजारहून अधिक पदांची मेगाभरती

लवकरच करा अर्ज; जाणून घ्या सविस्तर माहिती


मुंबई : अनेक तरुण बँकेत काम (Bank Job) करण्याची संधीच्या शोधात असतात. अशाच तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आयबीपीएसद्वारे (IBPS Recruitment) सरकारी बँकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी तरुणांना मिळत आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिग पर्सोनल सिलेक्शनने क्लर्क या पदासाठी तब्बल सहा हजारहून अधिक पदांची मेगाभरती जारी केली आहे. या पदासाठी अर्ज प्रकियेला सुरुवात झाली असून २८ जुलै ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे.


या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना ibps.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकणार आहेत. परंतु यासाठी उमेदवारांना प्रथम प्रिलियम आणि मुख्य परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यानंतर परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर तुमची मुलाखत घेतली जाणार आहे. याबाबतची प्रिलियम परीक्षा २४,२५ आणि ३१ ऑगस्ट २०२४ रोजी घेण्यात येईल. त्यानंतर पात्र उमेदवारांना बँकेत नोकरी करण्याची संधी मिळू शकेल.



काय आहे शैक्षणिक पात्रता, वयोगट आणि अर्ज फी?


या नोकरीसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त झालेले उमेदवार अर्ज करु शकतात. २० ते २८ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या परीक्षेसाठी ८५० रुपयांचे अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तसेच पात्र उमेदवारांना पहिल्या तीन वर्षी पगार १९,९०० रुपये असेल. त्यानंतर तो वर्षाला वाढेल, असे सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Iran Israel War : अमेरिकेच्या 'त्या' दाव्यांना भारताने फेटाळून लावले

अमेरिका इराणविरुद्ध लष्करी कारवाईसाठी भारतीय बंदरे आणि नौदल तळांचा वापर करत असल्याच्या दाव्यांना भारताने

UN मध्ये भारताची दहशतवादाविरोधात कडक भूमिका

- ISIS-अल-कायदाविरुद्ध जागतिक कारवाईचे आवाहन भारताने संयुक्त राष्ट्रात दहशतवादाविरोधात अत्यंत कडक भूमिका घेतली

Bihar Politics: बिहारच्या राजकारणात पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होणार?, नीतीश कुमार राज्यसभेवर जाणार?

मुंबई: बिहारच्या राजकारणात आज एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी

भारताच्या सागरी सीमेजवळ पोहोचलं युद्ध

पाणबुडी हल्ल्यात १०१ सैनिकांसह इराणी युद्धनौका बुडाली, ७८ जखमी नवी दिल्ली : हिंदी महासागरात श्रीलंकेच्या

India-Finland Bilateral relations : भारत आणि फिनलँडमधील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होतील - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या दौऱ्यावर असलेल्या फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांचे

पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली आहेत. देशाचे नागरी विमान