Bank Job : बँकेत काम करण्याची सुवर्णसंधी! तब्बल ६ हजारहून अधिक पदांची मेगाभरती

लवकरच करा अर्ज; जाणून घ्या सविस्तर माहिती


मुंबई : अनेक तरुण बँकेत काम (Bank Job) करण्याची संधीच्या शोधात असतात. अशाच तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आयबीपीएसद्वारे (IBPS Recruitment) सरकारी बँकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी तरुणांना मिळत आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिग पर्सोनल सिलेक्शनने क्लर्क या पदासाठी तब्बल सहा हजारहून अधिक पदांची मेगाभरती जारी केली आहे. या पदासाठी अर्ज प्रकियेला सुरुवात झाली असून २८ जुलै ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे.


या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना ibps.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकणार आहेत. परंतु यासाठी उमेदवारांना प्रथम प्रिलियम आणि मुख्य परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यानंतर परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर तुमची मुलाखत घेतली जाणार आहे. याबाबतची प्रिलियम परीक्षा २४,२५ आणि ३१ ऑगस्ट २०२४ रोजी घेण्यात येईल. त्यानंतर पात्र उमेदवारांना बँकेत नोकरी करण्याची संधी मिळू शकेल.



काय आहे शैक्षणिक पात्रता, वयोगट आणि अर्ज फी?


या नोकरीसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त झालेले उमेदवार अर्ज करु शकतात. २० ते २८ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या परीक्षेसाठी ८५० रुपयांचे अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तसेच पात्र उमेदवारांना पहिल्या तीन वर्षी पगार १९,९०० रुपये असेल. त्यानंतर तो वर्षाला वाढेल, असे सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही