Bank Job : बँकेत काम करण्याची सुवर्णसंधी! तब्बल ६ हजारहून अधिक पदांची मेगाभरती

लवकरच करा अर्ज; जाणून घ्या सविस्तर माहिती


मुंबई : अनेक तरुण बँकेत काम (Bank Job) करण्याची संधीच्या शोधात असतात. अशाच तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आयबीपीएसद्वारे (IBPS Recruitment) सरकारी बँकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी तरुणांना मिळत आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिग पर्सोनल सिलेक्शनने क्लर्क या पदासाठी तब्बल सहा हजारहून अधिक पदांची मेगाभरती जारी केली आहे. या पदासाठी अर्ज प्रकियेला सुरुवात झाली असून २८ जुलै ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे.


या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना ibps.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकणार आहेत. परंतु यासाठी उमेदवारांना प्रथम प्रिलियम आणि मुख्य परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यानंतर परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर तुमची मुलाखत घेतली जाणार आहे. याबाबतची प्रिलियम परीक्षा २४,२५ आणि ३१ ऑगस्ट २०२४ रोजी घेण्यात येईल. त्यानंतर पात्र उमेदवारांना बँकेत नोकरी करण्याची संधी मिळू शकेल.



काय आहे शैक्षणिक पात्रता, वयोगट आणि अर्ज फी?


या नोकरीसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त झालेले उमेदवार अर्ज करु शकतात. २० ते २८ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या परीक्षेसाठी ८५० रुपयांचे अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तसेच पात्र उमेदवारांना पहिल्या तीन वर्षी पगार १९,९०० रुपये असेल. त्यानंतर तो वर्षाला वाढेल, असे सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

खराब जेवण देणं पडलं महागात, भारतीय रेल्वेने आकारला ६० लाख रुपयांचा दंड

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे

पीएनजी असलेल्या भागात एलपीजी पुरवठा होणार बंद

नवी दिल्ली : देशातील ऊर्जा साखळीत मोठी सुधारणा करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले

आकाशवाणीवरुन २६ मार्चपासून "वंदे मातरम्" राष्ट्रीय गीताची पूर्ण आवृत्तीचे प्रसारण

नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर आकाशवाणी केंद्रांच्या सकाळच्या प्रसारणाची सुरुवात वैशिष्ट्यपूर्ण 'सिग्नेचर