Union Budget 2024 : नव्या अर्थसंकल्पात मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह 'या' गोष्टी स्वस्त

सोने, चांदीच्या दरात घसरण तर कॅन्सरवरील औषधंही मिळणार स्वस्तात


नवी दिल्ली : एनडीए सरकारच्या (NDA Government) तिसऱ्या कार्यकाळात आज केंद्रीय अर्थसंकल्प (Union budget 2024) सादर करण्यात आला. यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यातच मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह अनेक गोष्टींच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार कॅन्सरवरील औषधं, सोलार पॅनल, सोने, चांदी, लिथिअम बॅटरी, इलेक्ट्रॉनिक वाहनं, चामड्याच्या वस्तू या सर्व गोष्टी स्वस्तात मिळणार आहेत.


देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या निर्णयांसह मोबाईल, चार्जर आणि इतर गोष्टींवरील १५ टक्क्यांनी कमी करण्यात आलं आहे. या गोष्टींवर सीमाशुल्क (Custom Duty) खूप जास्त असल्याने या वस्तू खूप महाग होत्या. मात्र, आता मोबाइलवरील पीसीबीए (Printed Circuit Board Assembly) आणि मोबाईल चार्जरवरील बीसीडी (Basic Custom Duty) कस्टम ड्युटी १५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यामुळे आता ही उत्पादने स्वस्त होणार आहेत. सरकार देशात मोबाइल फोन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे उत्पादन करण्याला प्राधान्य देणार आहे.



का कमी करण्यात आली कस्टम ड्युटी?


अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत देशांतर्गत मोबाईल फोनच्या उत्पादनात वाढ झाली आहे आणि मोबाईल फोनच्या निर्यातीत १०० पट वाढ झाली आहे. गेल्या सहा वर्षात भारतातील मोबाईल उद्योग खूप विकसित झाला आहे. त्यामुळे मोबाईल आणि चार्जरवरील कस्टम ड्युटी १५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



सोने चांदीच्या दरात घसरण


सोने-चांदी आणि प्लॅटिनमच्या किंमती आता स्वस्त होणार आहेत. सोने-चांदीवरील कस्टम ड्युटी ६ टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे, तर प्लॅटिनमवरील कस्टम ड्युटी ६.५ टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही