Mumbai News : नागरिकांना दिलासा! मुंबईवरील पाणीकपातीचे सावट लवकरच दूर होणार

मुंबई : महापालिका प्रशासनाने (BMC) ३० मे पासून मुंबईसह इतर शहरांना ५ टक्के पाणीकपात (Mumbai Water Cut) जारी केला होता. तर ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय लागू केला होता. त्यामुळे मुंबईकरांना पाणीबाणीच्या संकटांना (Water Shortage) सामोरे जावे लागत होते. मात्र जुलै महिन्यापासून पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात चांगलीच हजेरी लावली आहे. मुंबईसह इतर जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्येही मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुंबईवरील पाणीकपातीचे सावट लवकरच दूर करण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात येणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, जोरदार पावसामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांसह धरणांमध्ये चांगला पाणीसाठा जमा झाला आहे. सध्या सात तलावांमध्ये मिळून ६,८४,४४० दशलक्ष लिटर पाणी जमा झाले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात मुंबईवरील पाणीकपात रद्द करण्याबाबत जल विभागाची आयुक्तांकडे निर्णायक बैठक होणार आहे. त्यानंतर पाणीकपातीबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मिळत आहे.



पाणी जपून वापरण्याचे आवाहन


मुंबई शहराला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, भातसा, आणि तुळशी या सात धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. यंदा पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस झाल्यामुळे महानगर पालिका पाणी कपातीचा निर्णय मागे घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र तरीही नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन मुंबई महानगर पालिकेने केले आहे.

Comments
Add Comment

राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या चौपदरीकरणामुळे वाशी APMC ला फायदा होणार, मुंबईकरांना दूध भाजीपाला आणखी ताजा मिळणार

मुंबई : दररोज मुंबईला प्रामुख्याने कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन दूध आणि

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही