Mumbai News : नागरिकांना दिलासा! मुंबईवरील पाणीकपातीचे सावट लवकरच दूर होणार

मुंबई : महापालिका प्रशासनाने (BMC) ३० मे पासून मुंबईसह इतर शहरांना ५ टक्के पाणीकपात (Mumbai Water Cut) जारी केला होता. तर ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय लागू केला होता. त्यामुळे मुंबईकरांना पाणीबाणीच्या संकटांना (Water Shortage) सामोरे जावे लागत होते. मात्र जुलै महिन्यापासून पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात चांगलीच हजेरी लावली आहे. मुंबईसह इतर जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्येही मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुंबईवरील पाणीकपातीचे सावट लवकरच दूर करण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात येणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, जोरदार पावसामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांसह धरणांमध्ये चांगला पाणीसाठा जमा झाला आहे. सध्या सात तलावांमध्ये मिळून ६,८४,४४० दशलक्ष लिटर पाणी जमा झाले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात मुंबईवरील पाणीकपात रद्द करण्याबाबत जल विभागाची आयुक्तांकडे निर्णायक बैठक होणार आहे. त्यानंतर पाणीकपातीबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मिळत आहे.



पाणी जपून वापरण्याचे आवाहन


मुंबई शहराला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, भातसा, आणि तुळशी या सात धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. यंदा पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस झाल्यामुळे महानगर पालिका पाणी कपातीचा निर्णय मागे घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र तरीही नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन मुंबई महानगर पालिकेने केले आहे.

Comments
Add Comment

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गांतील प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय

राज्यातील २८ हजार प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्ती फडणवीस सरकारचा शेतकरी हिताचा

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या, मध्य, आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; वेळ पाहूनच बाहेर पडा

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर

राज्यात ‘वन स्टेट, वन पोर्टल’ संकल्पनेला गती; महा सारथी पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : राज्यात डिजिटल गव्हर्नन्स अधिक सक्षम व नागरिककेंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘वन स्टेट, वन