Maharashtra Rain : गडचिरोलीत पावसाचा हाहाकार! चौथ्या दिवशीही पूरजन्य स्थिती कायम

अनेक मार्ग बंद; नागरिकांचे जनजीवन विस्कळीत


गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून पावसाने महाराष्ट्रात (Maharashtra Rain) जोरदार हजेरी लावली आहे. यातच हवामान विभागाने (IMD) मागील तीन दिवस दिलेला अतिवृष्टीचा (Heavy Rain) इशारा देखील खरा ठरला आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातल्याने अनेक रस्त्यांना नदीचे स्वरुप आले असून नागरिकांचे जनजीवन देखील विस्कळीत झाले. यातच गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. अजूनही ती कायम तशीच राहिली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मागील तीन दिवसांपासून गडचिरोली विभागात पावसाची संततधार सुरु असल्याने अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. तसेच शेतांमध्येही पाणी साचल्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासोबत जिल्ह्यातून गेलेल्या तीन राष्ट्रीय महामार्गांसह २३ प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी अजूनही बंदच ठेवल्याचे दिसून येत आहे. पाऊस सतत चालू असल्यामुळे पाण्याची पातळी कमी होत नाही, यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.


दरम्यान, वाहतूक बंद असणाऱ्या रस्त्यांवर पोलीस प्रशासनांकडून बॅरिकेट्स देखील लावण्यात आले आहेत. तसेच सलग दुसऱ्या दिवशीही शाळा, महाविद्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. त्यासोबत गोसेखुर्द धरणाच्या पाण्यामुळे वैनगंगा नदीला पूर आल्याने वाहनचालकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

Comments
Add Comment

Jalna : कॉलेजचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू आणि चौघे जखमी

जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये एका कॉलेजच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम सुरू असताना

Ahilyanagar Crime News : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार, मुकादमाच्या मुलावर गुन्हा दाखल

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एक संतापजनक घटना घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील एका गावातील

Pune News : पुणे स्थानकातून प्रवाशांची अजब हातसफाई : ५ वर्षांत ३ कोटींचे बेडशीट अन् टॉवेल लंपास; रेल्वेने ठेकेदाराकडून वसूल केली भरपाई!

पुणे : रेल्वेच्या वातानुकूलित (AC) डब्यातून प्रवास करताना प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वे

Pratap Sarnaik : गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई :  श्री गणरायाचे आगमन १४ सप्टेंबर रोजी होत असून, बाप्पाच्या स्वागतासाठी

Devendra Fadnavis : तिसऱ्या मुंबईसाठी ३२४ चौ.कि.मी. क्षेत्राचा 'मास्टर प्लॅन'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये 'मॅपलट्री'कडून १.१ अब्ज डॉलरची गुंतवणूक अपेक्षित मुंबई :

Nandurbar : नंदुरबार हादरलं ! अल्पवयीन मुलांसह तरुणांचे लैंगिक शोषण, दोनशेपेक्षा अधिक आक्षेपार्ह चित्रफिती

Nandurbar : नंदुरबारमध्ये एक हादरवणारा प्रकार उघडकीस आला आहे. नंदुरबारमध्ये अल्पवयीन बालकांसह काही तरुणांचे लैंगिक