श्रीलंकेत पोहोचली टीम इंडिया, कोच गंभीरचे पहिले मिशन

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ आपल्या पुढील मिशनसाठी श्रीलंकेला पोहोचली आहे. संघासोबतच नवे कोच गौतम गंभीरही सोबत आहेत. एक प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांचा पहिलाच दौरा आहे.


भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर ३ टी-२० सामन्यांची मालिका आणि ३ वनडे सामन्यांची खेळणार आहे. भारतीय संघ श्रीलंकेत पोहोचल्यावर अनेक फोटो तसेच व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या दौऱ्याची सुरूवात २७ जुलैला होत आहे.


भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला टी-२० सामना २७ जुलैला होईल. टी-२० मालिका पल्लेकलमध्ये होत आहे. त्यानंतर कोलंबोमध्ये वनडे मालिका खेळवली जाईल. दोन्ही संघादरम्यानचा पहिला वनडे सामना २ ऑगस्टला होईल. यानंतर शेवटचा वनडे सामना ७ ऑगस्टला खेळवला जाईल. यानंतर हा दौरा संपून जाईल.


श्रीलंका दौऱ्यात टी-२०चे नेतृत्व सूर्यकुमार यादवच्या हाती देण्यात आले आहे. तर वनडेची कमान वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार रोहित शर्माच्या हाती आहे.


 


भारत-श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक


२७ जुलै पहिला टी-२० सामना, पल्लेकल
२८ जुलै दुसरा टी-२० सामना, पल्लेकल
३० जुलै तिसरा टी-२० सामना, पल्लेकल
२ ऑगस्ट पहिला वनडे सामना, कोलंबो
४ ऑगस्ट दुसरा वनडे सामना, कोलंबो
७ ऑगस्ट तिसरा वनडे सामना कोलंबो

Comments
Add Comment

महिला क्रिकेट विश्वचषक : भारतीय संघाला विजयी हॅट्ट्रिकची संधी

विशाखापट्टणम: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने

IND vs AUS : फक्त १० धावा करताच रोहित शर्मा रचणार इतिहास

पर्थ/मेलबर्न: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय (ODI)

Asia Cup 2025 : बक्षीस मिळालेली कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकत नाही, जाणून घ्या कारण !

मुंबई : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने चमकदार कामगिरी करत "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट"चा किताब

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून

सुपरसंडे : पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताची दमदार सुरुवात

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकून