श्रीलंकेत पोहोचली टीम इंडिया, कोच गंभीरचे पहिले मिशन

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ आपल्या पुढील मिशनसाठी श्रीलंकेला पोहोचली आहे. संघासोबतच नवे कोच गौतम गंभीरही सोबत आहेत. एक प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांचा पहिलाच दौरा आहे.


भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर ३ टी-२० सामन्यांची मालिका आणि ३ वनडे सामन्यांची खेळणार आहे. भारतीय संघ श्रीलंकेत पोहोचल्यावर अनेक फोटो तसेच व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या दौऱ्याची सुरूवात २७ जुलैला होत आहे.


भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला टी-२० सामना २७ जुलैला होईल. टी-२० मालिका पल्लेकलमध्ये होत आहे. त्यानंतर कोलंबोमध्ये वनडे मालिका खेळवली जाईल. दोन्ही संघादरम्यानचा पहिला वनडे सामना २ ऑगस्टला होईल. यानंतर शेवटचा वनडे सामना ७ ऑगस्टला खेळवला जाईल. यानंतर हा दौरा संपून जाईल.


श्रीलंका दौऱ्यात टी-२०चे नेतृत्व सूर्यकुमार यादवच्या हाती देण्यात आले आहे. तर वनडेची कमान वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार रोहित शर्माच्या हाती आहे.


 


भारत-श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक


२७ जुलै पहिला टी-२० सामना, पल्लेकल
२८ जुलै दुसरा टी-२० सामना, पल्लेकल
३० जुलै तिसरा टी-२० सामना, पल्लेकल
२ ऑगस्ट पहिला वनडे सामना, कोलंबो
४ ऑगस्ट दुसरा वनडे सामना, कोलंबो
७ ऑगस्ट तिसरा वनडे सामना कोलंबो

Comments
Add Comment

टी-२० सामन्यात सोनम येशेचा ८ बळींचा जागतिक विक्रम

भूतानच्या फिरकीपटूने म्यानमारविरुद्ध रचला इतिहास; ४ षटकांत दिल्या ७ धावा भूतान : फिरकीपटू सोनम येशे याने इतिहास

न्यूझीलंडविरुद्ध वनडेतून ३ स्टार खेळाडूंचा पत्ता कट ? दिग्गजांचं कमबॅक ?

मुंबई : जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करणार

गौतम गंभीरच भारताचा कसोटी प्रशिक्षक

नवी दिल्ली : गौतम गंभीर भारताचा कसोटी प्रशिक्षक म्हणू्न कायम राहील. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट

भारतीय महिला हॉकीला सापडला नवा ‘हिरा’

प्रशिक्षिका हेलिना मेरीकडून बन्सुरी सोलंकीचे कौतुक नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकीच्या भविष्यातील सुरक्षित

श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघासाठी एक आनंदाची बाब समोर आली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय

तिरुवनंतपुरम : श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय झाला. या