श्रीलंकेत पोहोचली टीम इंडिया, कोच गंभीरचे पहिले मिशन

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ आपल्या पुढील मिशनसाठी श्रीलंकेला पोहोचली आहे. संघासोबतच नवे कोच गौतम गंभीरही सोबत आहेत. एक प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांचा पहिलाच दौरा आहे.


भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर ३ टी-२० सामन्यांची मालिका आणि ३ वनडे सामन्यांची खेळणार आहे. भारतीय संघ श्रीलंकेत पोहोचल्यावर अनेक फोटो तसेच व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या दौऱ्याची सुरूवात २७ जुलैला होत आहे.


भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला टी-२० सामना २७ जुलैला होईल. टी-२० मालिका पल्लेकलमध्ये होत आहे. त्यानंतर कोलंबोमध्ये वनडे मालिका खेळवली जाईल. दोन्ही संघादरम्यानचा पहिला वनडे सामना २ ऑगस्टला होईल. यानंतर शेवटचा वनडे सामना ७ ऑगस्टला खेळवला जाईल. यानंतर हा दौरा संपून जाईल.


श्रीलंका दौऱ्यात टी-२०चे नेतृत्व सूर्यकुमार यादवच्या हाती देण्यात आले आहे. तर वनडेची कमान वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार रोहित शर्माच्या हाती आहे.


 


भारत-श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक


२७ जुलै पहिला टी-२० सामना, पल्लेकल
२८ जुलै दुसरा टी-२० सामना, पल्लेकल
३० जुलै तिसरा टी-२० सामना, पल्लेकल
२ ऑगस्ट पहिला वनडे सामना, कोलंबो
४ ऑगस्ट दुसरा वनडे सामना, कोलंबो
७ ऑगस्ट तिसरा वनडे सामना कोलंबो

Comments
Add Comment

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे

IND vs SA Test : अवघ्या तीन दिवसांत भारताचा पराभव, मालिकेत पिछाडी, गुवाहाटीत ‘करो या मरो’ सामना

कोलकाता : ईडन गार्डन्सवरील पहिली कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली. भारताला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला.

कोलकाता कसोटीचा शेवटचा डाव सुरू, जयस्वाल पाठोपाठ केएल राहुलही बाद

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स