टी-२० कर्णधार सूर्यकुमारसाठी पत्नीने लिहिला हा भावूक मेसेज, पाहा


मुंबई: भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला श्रीलंका दौऱ्यासाठी टी-२० कर्णधार बनवण्यात आले आहे. सूर्याला कर्णधार बनवल्यानंतर त्याची पत्नी देविशा शेट्टीने त्याच्यासाठी भावूक मेसेज लिहिला आहे.





देविशाने इन्स्टाग्रामवर लिहिले की, जेव्हा तु भारतासाठी खेळण्यास सुरूवात केली होती तेव्हा आम्ही कधी विचार केला नव्हता की हा दिवस येईल. मात्र देव महान आहे आणि प्रत्येकाला तो त्याच्या मेहनतीचे फळ योग्य वेळी देतो. तुम्ही जे काही मिळवले आहे त्याच्यासाठी मला गर्व आहे. मात्र ही तर फक्त सुरूवात आहे अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे.





३३ वर्षीय फलंदाजाला रोहित शर्माच्या जागी भारताचा टी-२० कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. त्याला हार्दिक पांड्याऐवजी स्थान देण्यात आले. सूर्यकुमार यादव टी-२० वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही भाग होता. सूर्याने वर्ल्डकपच्या ८ सामन्यांमध्ये १९९ धावा या २८.४२च्या सरासरीने काढल्यात.





सूर्यकुमार यादव आणि देविशा मुंबईतील एकाच कॉलेजमधून शिकले आहेत. २०१६मध्ये दोघांचे लग्न झाले होते. देविशाने आपल्या पाठीवर सूर्यकुमार यादवच्या नावाचा टॅटूही बनवला आहे. देविशा इन्स्टाग्रामवर खूप अॅक्टिव्ह आहे. ती सातत्याने सूर्यासोबतचे फोटो शेअर करत असते.


Comments
Add Comment

वेस्ट इंडिज, द. आफ्रिका आणि इंग्लंडचे क्रिकेटपटू चार्टर विमानांनी परतणार मायदेशी

अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या युद्धामुळे, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड सारखे संघ

T20 वर्ल्डकप फायनलसाठी कशी असेल अहमदाबादची खेळपट्टी ? कसे असेल हवामान आणि कोण कोणत्या खेळाडूंना मिळेल खेळण्याची संधी ?

अहमदाबाद : क्रिकेटप्रेमींसाठी ८ मार्चचा रविवार म्हणजे पर्वणी आहे. कारण आज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता

आजचा ‘महामुकाबला’ कोण जिंकणार?

सुशील परब यंदाच्या टी-२० विश्वचषकाच्या या बहुप्रतिक्षित अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे दोन बलाढ्य संघ

आयसीसी स्पर्धांमधील ऑस्ट्रेलियाची मक्तेदारी भारत मोडीत काढणार

मुंबई (प्रतिनिधी) : टी-२० वर्ल्डकप २०२६ चा अंतिम सामना रविवारी अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात

All England Open : 'लक्ष्य सेन'ने रचला इतिहास! सलग दुसऱ्यांदा ऑल इंग्लंड ओपन चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक

लक्ष्य सेन याने २०२६ च्या ऑल इंग्लंड ओपनची अंतिम फेरी गाठत इतिहास रचला आहे. त्याने तीन सामन्यांच्या पुरुष

फक्त विजेतेपदासाठीच नाही; अनेक ऐतिहासिक शाप मोडण्यासाठीही भारत सज्ज!

मुंबई (प्रतिनिधी) : रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या फायनलमध्ये भारत आणि