Guru purnima : गुरुपौर्णिमेनिमित्त बाळासाहेबांविषयी नारायण राणे यांची खास पोस्ट!

  317





मुंबई : गुरुपौर्णिमा (Guru purnima) म्हणजे गुरुला वंदन करण्याचा दिवस. या दिवशी आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर लाभलेल्या गुरुला वंदन करुन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. लोकसभा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी देखील गुरुपौर्णिमेनिमित्त एक खास पोस्ट शेअर करत गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यासोबतचा जुना फोटो शेअर केला आहे. २००५ मध्ये त्यांनी शिवसेना सोडली आणि ते भाजपात सामील झाले. मात्र, त्यांच्या मनात बाळासाहेबांविषयी आदर आणि मनात गुरुचे स्थान कायम असल्याचं त्यांच्या पोस्टमधून व्यक्त झालं आहे.



नारायण राणे यांनी एक्स अकाऊंटवर खास पोस्ट केली आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असलेला त्यांचा जुना फोटो ट्वीट केला आहे. यासह त्यांनी पोस्टमध्ये "गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. #SriGuruPurnima", असं लिहिलं आहे. नारायण राणे यांनी शिवसेना पक्षातून राजकारणातील कारकि‍र्दीला सुरुवात केली. नारायण राणेंनी बाळासाहेब ठाकरेंकडून राजकारणाचे धडे घेतले, ते त्यांचे गुरु. कट्टर शिवसैनिक अशी ओळख असणाऱ्या नारायण राणेंनी २००५ मध्ये शिवसेना सोडली.






गेल्या दोन वर्षांत शिवसेना पक्षांतर्गत अनेक घडामोडी झाल्या. शिवसेनेचे दोन भाग होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दोन शिवसेना तयार झाल्या. हे दोन्ही गट बाळासाहेबांच्या विचारावर पक्ष चालत असल्याचा दावा करतात. या उलथापालथींमुळे राज्यातील राजकारण तापलेलं असतानाच बाळासाहेबांप्रती असलेला आदर मात्र कमी झालेला नाही. नारायण राणे यांनीदेखील भाजपमध्ये गेल्यानंतरही बाळासाहेबांना आपलं गुरु कायम मानलं आहे.


Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही