उत्तराखंडपासून ते महाराष्ट्रपर्यंत या राज्यांमध्ये दमदार पाऊस


मुंबई: भारतात सर्वत्र जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. उत्तराखंडपासून ते महाराष्ट्रापर्यंत अनेक राज्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तर काही राज्यांमध्ये सामान्यपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने आज म्हणजेच २१ जुलैला कर्नाटक, उत्तराखंड, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि केरळमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे.





भारतीय हवामान विभागाकडून देशातील ५ राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. येथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, गुजरात आणि गोवा येथे काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.





तसेच देशात मध्य आणि पश्चिमेकडील राज्यामध्येही जोरदार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.





राज्यात दमदार





राज्यातही पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. मुंबई, पुणे, पालघर, ठाणे, रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस होईल अशी शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेली आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भातही पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असा अंदाज आहे.


Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे