उत्तराखंडपासून ते महाराष्ट्रपर्यंत या राज्यांमध्ये दमदार पाऊस

  59


मुंबई: भारतात सर्वत्र जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. उत्तराखंडपासून ते महाराष्ट्रापर्यंत अनेक राज्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तर काही राज्यांमध्ये सामान्यपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने आज म्हणजेच २१ जुलैला कर्नाटक, उत्तराखंड, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि केरळमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे.





भारतीय हवामान विभागाकडून देशातील ५ राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. येथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, गुजरात आणि गोवा येथे काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.





तसेच देशात मध्य आणि पश्चिमेकडील राज्यामध्येही जोरदार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.





राज्यात दमदार





राज्यातही पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. मुंबई, पुणे, पालघर, ठाणे, रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस होईल अशी शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेली आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भातही पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असा अंदाज आहे.


Comments
Add Comment

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे