Asia Cup: भारताची सलग दुसऱ्या विजयासह सेमीफायनलमध्ये एंट्री


मुंबई: भारतीय महिला संघाने सलग दुसऱ्या विजयासह आशिया कपच्या सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. पाकिस्तानला हरवल्यानंतर यूएईविरुद्ध भारताने ७८ धावांनी मोठा विजय मिळवला. ऋचा घोषच्या तुफानी अर्धशतक आणि हरमनप्रीत कौरच्या कर्णधारीला साजेशी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना यूएईविरुद्ध ५ बा २०१ धावसंख्या उभारली होती. मात्र आव्हानाचा पाठलाग करताना यूएईचा संघ ७ बाद १२३ धावाच करू शकला.





महिला आशिया कपमध्ये भारताने यूएईविरुद्ध रविवारी मोठ्या विजयासह सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले. टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाने कर्णधार हरमनप्रीत कौरने कठीण वेळेस येता शानदार अर्धशतक ठोकले. यानंतर अखेरीस ऋचा घोषच्या विस्फोटक खेळीने संघाला दोनशे धावांचा टप्पा गाठून दिला. स्मृती मंधानाला या सामन्यात १३ धावा करता आल्या. तर शेफाली वर्माने ३७ धावांचे योगदान दिले. ३ विकेट झटपट पडल्यानंतर कर्णधार हरमनप्रीतने ४७ बॉलमध्ये ६६ धावांची खेळी केली.





ऋचा घोषचे तुफान अर्धशतक





सहाव्या स्थानावर फलंदाजीसाठी उतरलेल्या ऋचा घोषने केवळ २६ बॉलमध्ये ९ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने तुफानी अर्धशतक ठोकले. महिला आशिया कपच्या इतिहासात ऋचा टी-२० मध्ये अर्धशतक ठोकणारी पहिली विकेटकीपर बनली आहे. भारतीय संघाने स्पर्धेत २०० धावांचा स्कोर करत इतिहास रचला.


Comments
Add Comment

FIFA World Cup 2026 : पोर्तुगालचा क्रोएशियावर २-१ ने जोरदार विजय; 'राऊंड ऑफ १६'मध्ये धडक

FIFA World Cup 2026 : फिफा विश्वचषक २०२६ (FIFA World Cup 2026) च्या 'राऊंड ऑफ ३२' (Round of 32) सामन्यात पोर्तुगाल (Portugal)ने क्रोएशिया (Croatia)चा २-१ असा

FIFA World Cup 2026 : स्पेनचा दणदणीत विजय! ऑस्ट्रियाला ३-० ने हरवत उपांत्यपूर्व फेरीत धडक

लॉस एंजेलिस : फिफा विश्वचषक २०२६ (FIFA World Cup 2026) च्या राऊंड ऑफ ३२ (Round of 32) सामन्यात स्पेनने ऑस्ट्रियाचा ३-० असा एकतर्फी

India vs Sri Lanka : भारतीय संघ पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार

नवी दिल्ली : भारतीय संघ पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेच्या

FIFA WORLDCUP 2026 : 'रेड कार्ड'मुळे डॉमिनोज चे ९.५ कोटींचे फ्री पिझ्झा वाटप!

फिफा वर्ल्ड कप २०२६ सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, या स्पर्धेतील केवळ खेळाचा थरारच नाही, तर एका

Abhishek Sharma : अभिषेक शर्माने रचला इतिहास ! फक्त ७८५ चेंडूंत केला मोठा विक्रम

Mumbai : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द झाला. मात्र, संघाचा स्फोटक सलामीवीर फलंदाज

श्रेयस अय्यरची ऐतिहासिक कामगिरी! इंग्लंडमध्ये अर्धशतक करणारा पहिला भारतीय कर्णधार

चेस्टर-ले-स्ट्रीट : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाया गेला