Sharad Pawar : शरद पवारांच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने 'पिपाणी' चिन्ह गोठवलं!

नेमकं प्रकरण काय?


मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाने (NCP Sharad Pawar Group) 'पिपाणी' चिन्हामुळे झालेल्या गोंधळावरुन निवडणूक आयोगात (Election Commission) तक्रार केल्यानंतर आयोगाने हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवारांच्या मागणीनंतर हा मोठा निर्णय घेत निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांच्या चिन्हांमधून पिपाणी हे चिन्ह गोठवले आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला पक्षाचं मूळ नाव व 'घडयाळ' हे मूळ चिन्ह बहाल केलं. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्ह देण्यात आलं. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एका अपक्षाला निवडणूक आयोगाकडून पिपाणी हे चिन्ह देण्यात आलं होतं. पिपाणी हे चिन्ह तुतारीसारखेच दिसत असल्यामुळे शरद पवार गटाला लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा फटका बसला असावा, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने व्यक्त केली होती. त्यामुळे पिपाणी चिन्ह रद्द करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली होती.


शरद पवार गटाच्या या मागणीनंतर निवडणूक आयोगाने 'पिपाणी' हे चिन्ह गोठवले आहे. आता कोणत्याही अपक्ष उमेदवाराला पिपाणी चिन्ह दिले जाणार नाही अशी माहिती आहे.


Comments
Add Comment

अशोक हांडे यांनी महापालिका शाळेतील ती व्यक्त केली खंत...म्हणाले ,तर मोठा कलाकार झालो असतो!

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीचे शिक्षक हे खूप प्रतिभावान आहेत. शैक्षणिक

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची

BMC ची मोठी भेट: आता हॉस्पिटलमध्ये 'मोफत' आणि 'कॅशलेस' उपचार!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्याच्या सोयी चांगल्या करण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट सुरू केली आहे. या नव्या

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल