IND W vs PAK W: भारताने पाकिस्तानला लोळवले,७ विकेट राखत केला पराभव

दाम्बुला: महिला आशिया कप २०२४च्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला लोळवले. पाकिस्तानने विजयासाठी दिलेले १०९ धावांचे आव्हान भारताने ७ विकेट राखत पूर्ण केले. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील टीम इंडियाने पाकिस्तानला पूर्ण २० षटकेही खेळू दिली नाही. भारतासाठी दीप्ति शर्माने सर्वाधिक ३ विकेट काढल्या.


पाकिस्तानने दिलेले आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाच्या सलामीवीरांनी सुरूवातीपासूनच जोरदार फटकेबाजी केली. स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी जबरदस्त खेळी करताना भारताला हा विजय सुकर करून दिला.


स्मृती मंधानाने ३१ बॉलमध्ये ४५ धावा ठोकल्या. या खेळीदरम्यान तिने ९ चौकार ठोकले. तिने भारताच्या विजयाचा पारा रचून दिला. मंधाना बाद झाल्यानंतर काही वेळातच शेफाली वर्माही बाद झाली. तिने २९ बॉलमध्ये ४० धावा केल्या. त्यानंतर आलेल्या दयालन हेमलतालाही केवळ १४ धावा करता आल्या.


रेणुका ठाकूर, पूजा वस्त्राकार आणि श्रेयंका पाटीलने घातक गोलंदाजी केली. पाकिस्तानसाठी फातिमान सनाने नाबाद २२ धावा केल्या. तिने १६ बॉलचा सामना करताना २ षटकार आणि १ चौकार लगावला.


टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तानच्या संघाला केवळ १०८ धावाच करता आल्या. पाकिस्तानचा संघ १९.२ षटकांत ऑलआऊट झाला. पाकिस्तानसाठी गुल फेरोजा आणि मुनीबा अली सलामीसाठी आल्या होत्या. मुनीबा ११ धावा करून बाद झाली तिला पूजाने बाद केले. तर फिरोज ५ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. अमीनने २५ धावांची महत्त्वाची खेळी केली. मात्र त्यासाठी तिला ३५ बॉल खर्च करावे लागले. अमीनने रेणुकाला बाद केले. आलिया ६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली.


पाकिस्तानसाठी फातिमाने २२ धावांची महत्त्वाची खेळी केली. तिने १६ बॉलचा सामना करताना १ चौकार आणि २ षटकार लगावले. फातिमा नाबाद राहिली. हसनने १९ बॉलमध्ये २२ धावा केल्या.

Comments
Add Comment

ड्रीम-११ आणि माय-११ नंतर गुगलचा बीसीसीआयला आधार

मुंबई : बीसीसीआय पूर्वी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडून भरपूर उत्पन्न मिळवत होते. मात्र आता अशावेळी बोर्ड हे नुकसान

बॅडमिंटनपटू सायना नेहवालची निवृत्ती

गुडघ्याच्या दुखापतीने कारकिर्दीला पूर्णविराम मुंबई : भारतीय बॅडमिंटनला जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून

‘ए+’ श्रेणीतून विराट, रोहित, बुमराहला डच्चू?

बीसीसीआयच्या करारात ट्विस्ट : मानधनात कपात होण्याची शक्यता नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर

विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची परीक्षा

नागपुरात आज न्यूझीलंडविरुद्ध पहिली टी-२० लढत ; पांड्या, बुमराह, श्रेयसवर लक्ष नागपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या

कर्णधार सूर्यकुमार यादव गाठणार ‘शतकी’ टप्पा

नागपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा थरार बुधवारपासून नागपूरच्या विदर्भ

‘गचाळ क्षेत्ररक्षणामुळे मालिका गमाविली’

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील तिसरा सामना