IND vs SL: हा अन्याय आहे...रियान परागला मिळाले स्थान, अभिषेक-गायकवाड बाहेर, बीसीसीआयवर चिडले चाहते

  64

मुंबई: श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. सूर्यकुमार यादव टी-२० संघाचा कर्णधार बनला आहे. तर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे. रोहित शर्मा वनडेचे नेतृत्व करणार आहे. या दौऱ्यासाठी टी-२० संघात ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्माला स्थान मिळालेले नाही.


त्यांनी नुकत्याच झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी केली होती. रियान परागला संघात संधी मिळाली आहे. चाहते मात्र यामुळे चांगलेच नाराज झालेत. ते सातत्याने आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.


एका चाहत्याने ऋतुराज गायकवाडचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले, हे पहिल्यांदाच घडलेले नाही की जेव्हा त्यांच्यासोबत अन्याय झाला. हे अंडर १९ संघ निवडीनंतर होतच आहे.


 


एका दुसऱ्या चाहत्याने लिहिले, ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मासाठी वाईट वाटत आहे. खरंतर रियान परागपेक्षा त्यांचा हक्क आहे मात्र गिल भाईची तर मजा आहे.


 


एका इतर युजरने लिहिले की, ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्माची निवड झाली नाही. मात्र रियान परागला दोन्ही प्रकारांमध्ये निवडण्यात आले. असे वाटत आहे की मी वेगळ्या दुनियेत आहे.


 


टीम इंडियाच्या झिम्बाब्वेमधील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेनंतर अभिषेक शर्मा चर्चेचा केंद्रस्थानी ठरला होता. शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघातील अभिषेकने ५ सामन्यांत ३१च्या सरासरीने १२४ धावा केल्या. मात्र त्याने या धावा १७४.६४च्या स्ट्राईक रेटने ठोकल्या. पदार्पणाच्या सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याने ४६ बॉलमध्ये शतक ठोकले होते.

Comments
Add Comment

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण