IND vs SL: हा अन्याय आहे...रियान परागला मिळाले स्थान, अभिषेक-गायकवाड बाहेर, बीसीसीआयवर चिडले चाहते

मुंबई: श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. सूर्यकुमार यादव टी-२० संघाचा कर्णधार बनला आहे. तर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे. रोहित शर्मा वनडेचे नेतृत्व करणार आहे. या दौऱ्यासाठी टी-२० संघात ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्माला स्थान मिळालेले नाही.


त्यांनी नुकत्याच झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी केली होती. रियान परागला संघात संधी मिळाली आहे. चाहते मात्र यामुळे चांगलेच नाराज झालेत. ते सातत्याने आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.


एका चाहत्याने ऋतुराज गायकवाडचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले, हे पहिल्यांदाच घडलेले नाही की जेव्हा त्यांच्यासोबत अन्याय झाला. हे अंडर १९ संघ निवडीनंतर होतच आहे.


 


एका दुसऱ्या चाहत्याने लिहिले, ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मासाठी वाईट वाटत आहे. खरंतर रियान परागपेक्षा त्यांचा हक्क आहे मात्र गिल भाईची तर मजा आहे.


 


एका इतर युजरने लिहिले की, ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्माची निवड झाली नाही. मात्र रियान परागला दोन्ही प्रकारांमध्ये निवडण्यात आले. असे वाटत आहे की मी वेगळ्या दुनियेत आहे.


 


टीम इंडियाच्या झिम्बाब्वेमधील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेनंतर अभिषेक शर्मा चर्चेचा केंद्रस्थानी ठरला होता. शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघातील अभिषेकने ५ सामन्यांत ३१च्या सरासरीने १२४ धावा केल्या. मात्र त्याने या धावा १७४.६४च्या स्ट्राईक रेटने ठोकल्या. पदार्पणाच्या सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याने ४६ बॉलमध्ये शतक ठोकले होते.

Comments
Add Comment

Smriti Mandhana : कौतुकास्पद! स्मृती मानधना पुन्हा ठरली आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल

आयसीसी क्रमवारीमध्ये भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना एकदिवसीय फलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर

CSK New Jersey : चेन्नई सुपर किंग्जच्या नव्या जर्सीचे अनावरण

पाच वेळा विजेत्या चेन्नई सुपर किंग्जने म्हणजेच सीएसकेने आयपीएल २०२६ च्या आधी त्यांची नवीन जर्सीचे अनावरण केले

T20 World Cup 2026 Ind vs WI : वेस्ट इंडिज विरुद्धच्या विजयी खेळीनंतर संजू सॅमसन भावुक

टी-२० विश्वचषकामध्ये सुपर ८ च्या एका महत्त्वाच्या सामन्यात वेस्ट इंडिजला पाच विकेट्सनी पराभूत करत भारताने

IND vs WI: एका ओव्हरमध्येच सगळंच बदललं; भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात सर्वात मोठा टर्निंग पॉईंट कधी झाला?

मुंबई : भारताने दक्षिण आफ्रिका संघाचा पाच विकेटने पराभव करत सेमी फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली आहे.

संजूची बॅट तळपली, टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचली

कोलकाता : ईडन गार्डनवर झालेल्या सुपर आठ फेरीतल्या वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्यात भारत पाच विकेट राखून जिंकला.

बुमराहसमोर वेस्ट इंडिजचा हेटमायर हतबल

कोलकाता : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये सुपर एट फेरीत आज भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हा निर्णायक सामना