स्वस्त आणि मस्त Airtelने सादर केले तीन नवे प्लान, मिळणार अनलिमिटेड ५जी डेटा

मुंबई: एअरटेलने नुकतेच आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड प्लानच्या किंमतीत वाढ केली आहे. टेलिकॉम कंपनीने घोषणा केली आहे की त्यांनी एंट्री लेव्हल प्लानच्या किंमतीत ७० पैशांची वाढ केली आहे. आता कंपनीने काही नवे बूस्टर पॅक सादर केले आहेत. एअरटेलने ५१ रूपयांचा, १०१ रूपयांचा आणि १५१ रूपयांचे तीन नवे बूस्टर पॅक सादर केले आहेत. नव्या टॉप अप डेटा प्लानमुळे युजर्सला अनलिमिटेड ५जी डेटाचा फायदा मिळेल.



नवे ५जी डेटा पॅक


एअरटेलने ५१ रूपयांपासून सुरू होणारे तीन नवे डेटा पॅक सादर केले आहेत. कंपनीने घोषणा केली आहे की युजर्सला अपग्रेड करण्यासाठी दररोज १ जीबी अथवा १.५ जीबी डेटा मिळणार तसेच ग्राहकांना ५जी स्पीड डेटा मिळेल.


एअरटेलने ५१ रूपये, १०१ रूपये आणि १५१ रूपयांचे बूस्टर प्लान सादर केले आहेत. कंपनीच्या ५१ रूपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना ३ जीबी ४जी डेटा, १०१ रूपयांच्या प्लानमध्ये ६ जीबी ४जी डेटा आणि १५१ रूपयांच्या प्लानमध्ये ९ जीबी ४जी डेटा मिळणार आहे. हे नवे डेटा पॅक सध्याच्या पॅकसोबत अॅक्टिव्हेट करू शकणार आणि अनलिमिटेड ५जी एन्जॉय करू शकणार आहे. याची व्हॅलिडिटी सध्याच्या प्लानइतकी असणार आहे.


किंमती वाढवल्यानंतर एअरटेलचा सर्वात स्वस्त ५जी प्लान २४९ रूपयांचा आहे. तर पोस्टपेड प्लान ४४९ रूपयांचा आहे. या प्लानबद्दल बोलायचे झाल्यास ग्राहकांना दररोज १ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉल्स, २४ दिवसाची व्हॅलिडिटी, विंकवर १ फ्री हॅलोट्यून आणि विंक म्युझिकचा अॅक्सेस दिला जातो.

Comments
Add Comment

Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात

Mumbai News : मुंबईत पाण्याचा निचरा करण्यासाठी ५४७ पंपांची आणि फिरते डीवॉटरिंग पंप असणाऱ्या १० वाहनांची व्यवस्था

मुंबईत यंदा पाणी साचण्याची फक्त ८० ठिकाणे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची

BMC News : 'मध्य वैतरणा प्रकल्प राबवताना तुमचे पर्यावरण प्रेम कुठे होते?'

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई पाणी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी स्थायी समिती व महापालिका

single-window clearance : लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा

मुंबई : राज्यातील लाईव्ह मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह

Godavari to Narmada : असा होणार गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा समारोप समारंभ

मुंबई : जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या

Seeds Act : राज्याचा स्वतंत्र बियाणे कायदा करणार

मुंबई : शेतकऱ्यांना स्वतःचे बियाणे साठवणे, वापरणे, देवाणघेवाण करणे आणि (ब्रँडेड नाव न वापरता) विक्री करण्यास