Road Pits : रस्त्यांची झाली चाळण; वाहनचालक हैराण

  136

वाडा : वाडा तालुक्यातील कोंढले-म्हसवल-खैरे रस्ता हा अनेक गावांना मुख्य बाजारपेठेस जोडणाऱ्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्यावर मीठमोठे खड्डे पडले असून या रस्त्यावर वाहन चालवणे जिकिरीचे व कठीण होऊन बसल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत. वाडा तालुक्यातील सर्वात खराब मार्ग म्हणून या रस्त्याची ओळख निर्माण झाली आहे. या खराब रस्त्यासंदर्भात वारंवार तक्रारी करून देखील सबंधित अधिकारी या रस्त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असल्याचा आरोप भाजपा महीला आघाडीच्या तालुका अध्यक्षा अंकिता दुबेले यांनी केला आहे. या रस्त्यावरील सापरोंडे ते दिनकरपाडा दरम्यान काँक्रीट मार्ग करण्यात आला आहे.


मात्र निकृष्ट दर्जामुळे तोही दुभंगला गेला आहे. दिनकरपाडा रस्त्यावर खड्डे पडले असून वाहनचालक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. चंद्रपाडा व पुढे खैरे गावाकडे जाणारा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बनविण्यात आला होता. मात्र बनविल्यापासूनच या मार्गाची अवस्था गंभीर असल्याने लोकांच्या नशिबात सहा महिनेही चांगला प्रवास आला नाही.

Comments
Add Comment

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची

मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट जमिनीवर कोसळली

बीड : मराठा नेते मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्य होते त्या लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट जमिनीवर धाडकन कोसळली. मनोज

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने