Road Pits : रस्त्यांची झाली चाळण; वाहनचालक हैराण

  110

वाडा : वाडा तालुक्यातील कोंढले-म्हसवल-खैरे रस्ता हा अनेक गावांना मुख्य बाजारपेठेस जोडणाऱ्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्यावर मीठमोठे खड्डे पडले असून या रस्त्यावर वाहन चालवणे जिकिरीचे व कठीण होऊन बसल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत. वाडा तालुक्यातील सर्वात खराब मार्ग म्हणून या रस्त्याची ओळख निर्माण झाली आहे. या खराब रस्त्यासंदर्भात वारंवार तक्रारी करून देखील सबंधित अधिकारी या रस्त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असल्याचा आरोप भाजपा महीला आघाडीच्या तालुका अध्यक्षा अंकिता दुबेले यांनी केला आहे. या रस्त्यावरील सापरोंडे ते दिनकरपाडा दरम्यान काँक्रीट मार्ग करण्यात आला आहे.


मात्र निकृष्ट दर्जामुळे तोही दुभंगला गेला आहे. दिनकरपाडा रस्त्यावर खड्डे पडले असून वाहनचालक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. चंद्रपाडा व पुढे खैरे गावाकडे जाणारा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बनविण्यात आला होता. मात्र बनविल्यापासूनच या मार्गाची अवस्था गंभीर असल्याने लोकांच्या नशिबात सहा महिनेही चांगला प्रवास आला नाही.

Comments
Add Comment

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या