Mumbai News : मुंबईतील धोकादायक दरडींच्या ठिकाणी म्हाडा बांधणार ५६ संरक्षक भिंती

Share

भिंतींवर झोपड्या वाढणार नाहीत; प्रशासन घेणार खबरदारी

मुंबई : मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर वाढल्याने डोंगरालगत असलेल्या स्थानिक झोपडीधारकांवर दरड कोसळण्याची टांगती तलवार आहे. त्यामुळे अशा धोकादायक दरडींच्या ठिकाणी तब्बल ५६ मजबूत दगडी भिंती बांधण्याचा प्रस्ताव म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाने तयार करून जिल्हा नियोजन समितीला नुकताच पाठवला आहे. या कामासाठी आवश्यक असलेला निधी मंजूर झाल्यानंतर तत्काळ कामाला सुरुवात केली जाणार आहे.

मुंबई शहरातील दरडप्रवण क्षेत्र कमी असले, तरी उपनगरात भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, चांदिवली, मुलुंड, अणुशक्ती नगर, जोगेश्वरी, कांदिवली, कुर्ला, चुनाभट्टी, काजूपाडा अशा ठिकाणी डोंगरालगत झोपड्या आहेत. या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाकडून सदर ठिकाणांचा अभ्यास करून दगडी भिंत बांधली जाते. म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाकडून या भिंती उभारल्या जात असल्या, तरी त्यांच्याकडे कोणताही स्वतंत्र निधी नसतो. त्यामुळे त्यांनी ५६ ठिकाणी भिंती बांधण्याचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविला आहे. याबाबतचा निधी मंजूर झाल्यावर काम सुरू केले जाईल, असे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र या दरडप्रवण डोंगरावर सध्या मोठ्या प्रमाणात झोपड्या बांधल्या जात आहेत. त्यासाठी खोदकाम केले जाते. तसेच डोंगरावर वास्तव्याला असलेले रहिवाशांकडून कचरा, सांडपणी डोगरांवरून खाली सोडतात. त्यामुळे डोंगर कमकुवत होऊन दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात यावर प्रशासन खबरदारी घेणार आहे.

याठिकाणी डोंगराला लागून असलेल्या झोपड्यांवर दरड कोसळू नये यासाठी म्हाडाकडून नेहमी संरक्षक भिंती बांधल्या जातात. मात्र या मजबूत भिंतींवर नागरिक पुन्हा झोपड्या बांधत असल्याने या भिंती पुन्हा कमकुवत होत असून दरडींबरोबरच त्याही कोसळण्याचा धोका असतो. त्यामुळे पालिकेने संरक्षक भिंतींवर झोपड्या वाढणार नाहीत, याबाबत खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे झोपडपट्टी सुधार मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Recent Posts

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

12 minutes ago

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

40 minutes ago

PahalgamTerrorist Attack : डोंबिवलीच्या तीन जणांसह महाराष्ट्राचे चार पर्यटक ठार

पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…

1 hour ago

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

6 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

7 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

7 hours ago