Ind vs Sl: भारत-श्रीलंका मालिका कधीपासून, किती वाजता रंगणार सामने, घ्या जाणून

  83

मुंबई: भारत आणि श्रीलंका यांच्यातील क्रिकेट मालिका २७ जुलैपासून सुरू होत आहे. मालिका सुरू होण्यास १० दिवसही उरलेले नाहीत मात्र अद्याप भारताकडून या मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. दुसरीकडे श्रीलंकेकडूनही या मालिकेसाठी संघाची घोषणा कऱण्यात आलेली नाही.


संभाव्य संघाबाबत बोलायचे झाल्यास सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्यासह विश्वकप जिंकून परतलेल्या खेळाडूंचे पुनरागमन शक्य आहे. सूर्यकुमार यादव अथवा हार्दिक पांड्या भारतीय टी-२० संघाचा कर्णधार असू शकतो. जाणून घेऊया कधीपासून सुरू होणार ही मालिका, सामन्यांची वेळ आणि बरंच काही...



भारत-श्रीलंका मालिका कधीपासून सुरू होत आहे?


भारत आणि श्रीलंका यांच्यातील द्विपक्षीय मालिकेची सुरूवात २७ जुलैपासून होत आहे. आधी टी-२० मालिका आणि नंतर वनडे मालिका खेळवली जाईल. तीन टी-२० सामने पल्लेकलमध्ये होतील. यानंतर कोलंबोमध्ये वनडे मालिका खेळवली जाईल.



भारत-श्रीलंका सामने किती वाजता सुरू होतील?


भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होतील. तर वनडे सामने दुपारी अडीच वाजता सुरू होतील.



गौतम गंभीरची नवी सुरूवात


भारत आणि श्रीलंका याच्या मालिकेद्वारे गौतम गंभीर नवी सुरूवात करत आहे. आधी खेळाडू म्हणून त्यानंतर आता प्रशिक्षक म्हणून तो या मालिकेतून नवी सुरूवात करत आहे. बीसीसीआयने गंभीरला २०२७ पर्यंत टीम इंडियाचा कोच बनवले आहे. गौतम गंभीरने राहुल द्रविडची जागा घेतली आहे.

Comments
Add Comment

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण