Ind vs Sl: भारत-श्रीलंका मालिका कधीपासून, किती वाजता रंगणार सामने, घ्या जाणून

मुंबई: भारत आणि श्रीलंका यांच्यातील क्रिकेट मालिका २७ जुलैपासून सुरू होत आहे. मालिका सुरू होण्यास १० दिवसही उरलेले नाहीत मात्र अद्याप भारताकडून या मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. दुसरीकडे श्रीलंकेकडूनही या मालिकेसाठी संघाची घोषणा कऱण्यात आलेली नाही.


संभाव्य संघाबाबत बोलायचे झाल्यास सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्यासह विश्वकप जिंकून परतलेल्या खेळाडूंचे पुनरागमन शक्य आहे. सूर्यकुमार यादव अथवा हार्दिक पांड्या भारतीय टी-२० संघाचा कर्णधार असू शकतो. जाणून घेऊया कधीपासून सुरू होणार ही मालिका, सामन्यांची वेळ आणि बरंच काही...



भारत-श्रीलंका मालिका कधीपासून सुरू होत आहे?


भारत आणि श्रीलंका यांच्यातील द्विपक्षीय मालिकेची सुरूवात २७ जुलैपासून होत आहे. आधी टी-२० मालिका आणि नंतर वनडे मालिका खेळवली जाईल. तीन टी-२० सामने पल्लेकलमध्ये होतील. यानंतर कोलंबोमध्ये वनडे मालिका खेळवली जाईल.



भारत-श्रीलंका सामने किती वाजता सुरू होतील?


भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होतील. तर वनडे सामने दुपारी अडीच वाजता सुरू होतील.



गौतम गंभीरची नवी सुरूवात


भारत आणि श्रीलंका याच्या मालिकेद्वारे गौतम गंभीर नवी सुरूवात करत आहे. आधी खेळाडू म्हणून त्यानंतर आता प्रशिक्षक म्हणून तो या मालिकेतून नवी सुरूवात करत आहे. बीसीसीआयने गंभीरला २०२७ पर्यंत टीम इंडियाचा कोच बनवले आहे. गौतम गंभीरने राहुल द्रविडची जागा घेतली आहे.

Comments
Add Comment

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतही जसप्रीत बुमराहच अव्वल

दुबई (वृत्तसंस्था): आयसीसीने बुधवारी त्यांची ताजी क्रमवारी जाहीर केली. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कुलदीप

महिला क्रिकेट विश्वचषक : भारतीय संघाला विजयी हॅट्ट्रिकची संधी

विशाखापट्टणम: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने

IND vs AUS : फक्त १० धावा करताच रोहित शर्मा रचणार इतिहास

पर्थ/मेलबर्न: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय (ODI)

Asia Cup 2025 : बक्षीस मिळालेली कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकत नाही, जाणून घ्या कारण !

मुंबई : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने चमकदार कामगिरी करत "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट"चा किताब

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून