Ind vs Sl: भारत-श्रीलंका मालिका कधीपासून, किती वाजता रंगणार सामने, घ्या जाणून

  72

मुंबई: भारत आणि श्रीलंका यांच्यातील क्रिकेट मालिका २७ जुलैपासून सुरू होत आहे. मालिका सुरू होण्यास १० दिवसही उरलेले नाहीत मात्र अद्याप भारताकडून या मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. दुसरीकडे श्रीलंकेकडूनही या मालिकेसाठी संघाची घोषणा कऱण्यात आलेली नाही.


संभाव्य संघाबाबत बोलायचे झाल्यास सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्यासह विश्वकप जिंकून परतलेल्या खेळाडूंचे पुनरागमन शक्य आहे. सूर्यकुमार यादव अथवा हार्दिक पांड्या भारतीय टी-२० संघाचा कर्णधार असू शकतो. जाणून घेऊया कधीपासून सुरू होणार ही मालिका, सामन्यांची वेळ आणि बरंच काही...



भारत-श्रीलंका मालिका कधीपासून सुरू होत आहे?


भारत आणि श्रीलंका यांच्यातील द्विपक्षीय मालिकेची सुरूवात २७ जुलैपासून होत आहे. आधी टी-२० मालिका आणि नंतर वनडे मालिका खेळवली जाईल. तीन टी-२० सामने पल्लेकलमध्ये होतील. यानंतर कोलंबोमध्ये वनडे मालिका खेळवली जाईल.



भारत-श्रीलंका सामने किती वाजता सुरू होतील?


भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होतील. तर वनडे सामने दुपारी अडीच वाजता सुरू होतील.



गौतम गंभीरची नवी सुरूवात


भारत आणि श्रीलंका याच्या मालिकेद्वारे गौतम गंभीर नवी सुरूवात करत आहे. आधी खेळाडू म्हणून त्यानंतर आता प्रशिक्षक म्हणून तो या मालिकेतून नवी सुरूवात करत आहे. बीसीसीआयने गंभीरला २०२७ पर्यंत टीम इंडियाचा कोच बनवले आहे. गौतम गंभीरने राहुल द्रविडची जागा घेतली आहे.

Comments
Add Comment

व्हीआयपींच्या उपस्थितीत रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांचा साखरपुडा संपन्न

लखनऊ : भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा लखनऊ येथील द

आज होणार क्रिकेटपटू रिंकू सिंहचा साखरपुडा

लखनऊ : भारतीय क्रिकेटर रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाची खासदार प्रिया सरोज यांचा साखपुडा आज म्हणजेच रविवार ८ जून

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.