Maharashtra Rain : मुंबईत मुसळधार पाऊस! पुढील तीन दिवस महत्त्वाचे

'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी


मुंबई : काल मुंबईत दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्रीपासून मुंबईसह अनेक उपनगरात (Mumbai Rain) जोरदार हजेरी लावली. अशातच हवामान विभागाने (IMD) अतिवृष्टीचा (Heavy Rain Alert) इशारा देऊन अलर्ट जारी केला आहे. आज सकाळी ५.३० वाजे पर्यंत दक्षिण मुंबईत ५१.८ मिमी तर पश्चिम उपनगरात २७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील तीन दिवस पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी गरज असल्यास घराबाहेर पडा असे आवाहन केले आहे.


हवामान विभागानुसार, गुजरातच्या किनारपट्टीपासून ते केरळच्या किनारपट्टीपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे किनारपट्टीवर पावसाचा जोर राहणार आहे. त्यातच कोकण किनारपट्टी आणि विदर्भात पुढील तीन दिवस पावसाच्या सरी कोसळणार आहेत. तर रत्नागिरीत काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून आज रत्नागिरीसाठी रेड अलर्ट तर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड, मुंबई, ठाणे, पालघरसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.



विदर्भात पावसाचा जोर वाढणार


बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. यामुळे विदर्भ आणि विदर्भाला जोडून असलेल्या मराठवाड्यातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून उद्यापासून पूर्व विदर्भात आणखी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

मराठा सेवा संघाच्या नकुल भोईरची हत्या, पत्नीला अटक

पुणे: पुणे जिल्ह्यातील चिंचवड परिसरात मध्यरात्री घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मराठा सेवा संघ आणि

पुणेकरांसाठी पुन्हा त्रासदायक बातमी; भिडे पूल पुन्हा बंद, नववर्षातच खुला होण्याची शक्यता

पुणे : पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासातील एक महत्त्वाचा दुवा असलेला बाबाराव भिडे पूल पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद

Maharashtra Rain Updates : पावसाचा जोर कायम! आज कुठे-कुठे कोसळणार वादळी पाऊस? २५ ते २८ ऑक्टोबर दरम्यान हवामान खात्याचा मोठा इशारा

मुंबई : सध्या दिवसभर जाणवणाऱ्या 'ऑक्टोबर हीट' (October Heat) मुळे नागरिक हैराण झाले असून, राज्यात उकाडा चांगलाच वाढला आहे.

Phaltan Doctor death case : ब्रेकिंग! फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात प्रशांत बनकर अखेर अटक

सातारा : साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील (Phaltan Sub District Hospital) महिला डॉक्टरच्या आत्महत्या (Suicide) प्रकरणात आता एक

वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठे संकट टळले! नागपूरहून उड्डाण केलेल्या विमानाला धडकला पक्षी...

नागपूर: नागपूरहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानावरील मोठे संकट टळले. विमानाने उड्डाण करताच

राज्यातील बांगलादेशी घुसखोरांना दणका! राज्य सरकारचे मोठे पाऊल, रेशनकार्ड पडताळणीचे आदेश

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी वाढत चालली आहे. याकरता राज्यभरात