Maharashtra Rain : मुंबईत मुसळधार पाऊस! पुढील तीन दिवस महत्त्वाचे

  108

'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी


मुंबई : काल मुंबईत दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्रीपासून मुंबईसह अनेक उपनगरात (Mumbai Rain) जोरदार हजेरी लावली. अशातच हवामान विभागाने (IMD) अतिवृष्टीचा (Heavy Rain Alert) इशारा देऊन अलर्ट जारी केला आहे. आज सकाळी ५.३० वाजे पर्यंत दक्षिण मुंबईत ५१.८ मिमी तर पश्चिम उपनगरात २७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील तीन दिवस पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी गरज असल्यास घराबाहेर पडा असे आवाहन केले आहे.


हवामान विभागानुसार, गुजरातच्या किनारपट्टीपासून ते केरळच्या किनारपट्टीपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे किनारपट्टीवर पावसाचा जोर राहणार आहे. त्यातच कोकण किनारपट्टी आणि विदर्भात पुढील तीन दिवस पावसाच्या सरी कोसळणार आहेत. तर रत्नागिरीत काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून आज रत्नागिरीसाठी रेड अलर्ट तर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड, मुंबई, ठाणे, पालघरसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.



विदर्भात पावसाचा जोर वाढणार


बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. यामुळे विदर्भ आणि विदर्भाला जोडून असलेल्या मराठवाड्यातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून उद्यापासून पूर्व विदर्भात आणखी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत

Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले.  पुणे:  दुबईहून