Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी १५ दिवसांत ४४ लाख महिलांचे ऑनलाईन अर्ज

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये (Mukhyamantri Ladaki Bahin Yojana) १५ दिवसांत तब्बल ४४ लाख महिलांनी ऑनलाइन पद्धतीने (online) अर्ज (applications) केले आहेत. तर ऑफलाइन पद्धतीने अर्ज केलेल्या महिलांचा आकडा लवकरच समोर येईल, अशी माहिती राज्याच्या महिला आणि बालकल्याण विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी दिली. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत.


एक जुलै २०२४ पासून या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. तर ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत असणार आहे. या योजनेसाठी राज्य सरकार दरवर्षी तब्बल ४६ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.


या योजनेचा २१ ते ६५ वयोगटातील महिला लाभ घेऊ शकणार आहेत. ही योजना गरीब महिलांसाठी असणार असून, पिवळं आणि केशरी रेशनकार्ड धारकांना याचा लाभ होणार आहे. ३.५० कोटी महिलांना फायदा होण्याची आशा आहे. दरम्यान, लाभार्थीचे वर्षाला उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा कमी असावे, अशी अट आहे.

Comments
Add Comment

Satara Accident : पालखीचे दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; नेमकं काय घडलं?

सातारा : सातारा-पुसेगाव मार्गावर (Satara-Pusegaon Road) शुक्रवारी (१७ जुलै) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फॉर्च्युनर

Maharashtra Election : मतदार यादी पुनरीक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम यादी १९ ऑक्टोबरला

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाचे

Firoz Baba Case : फिरोज बाबा प्रकरणात तपासाची गती; ठाणे पोलिसांकडून पाच जणांना समजपत्र

ठाणे : फिरोज बाबा प्रकरणातील तपासाला वेग आला असून, ठाकरे शिवसेनेचे (Shevsena) माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून

Kalidas Maharaj : कालीदास महाराजांचे अपघाती निधन, ४० वर्षांत उच्चारला नव्हता एकही शब्द

परभणी : मराठवाड्यातील एक अध्यात्मिक गुरु अशी ख्याती असलेल्या आणि मागील चार दशकांपासून एकही शब्द न बोलता केवळ

Dhule Crime News : कंपनीवर 'हा' मोठा आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ बनवत म्हणाला...

Dhule Crime News : धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळील गिधाडे तापी नदीच्या पुलावरून उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला

Tribal Reservation : धर्मांतर केलेल्या आदिवासींच्या सवलती बंद होणार?

- राज्य सरकार ऍक्शन मोडवर; सर्वसमावेशक धोरणासाठी २७ जणांची समिती मुंबई : धर्मांतरानंतरही अनुसूचित जमातीचे