Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी १५ दिवसांत ४४ लाख महिलांचे ऑनलाईन अर्ज

  132

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये (Mukhyamantri Ladaki Bahin Yojana) १५ दिवसांत तब्बल ४४ लाख महिलांनी ऑनलाइन पद्धतीने (online) अर्ज (applications) केले आहेत. तर ऑफलाइन पद्धतीने अर्ज केलेल्या महिलांचा आकडा लवकरच समोर येईल, अशी माहिती राज्याच्या महिला आणि बालकल्याण विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी दिली. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत.


एक जुलै २०२४ पासून या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. तर ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत असणार आहे. या योजनेसाठी राज्य सरकार दरवर्षी तब्बल ४६ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.


या योजनेचा २१ ते ६५ वयोगटातील महिला लाभ घेऊ शकणार आहेत. ही योजना गरीब महिलांसाठी असणार असून, पिवळं आणि केशरी रेशनकार्ड धारकांना याचा लाभ होणार आहे. ३.५० कोटी महिलांना फायदा होण्याची आशा आहे. दरम्यान, लाभार्थीचे वर्षाला उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा कमी असावे, अशी अट आहे.

Comments
Add Comment

शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला

संगमनेर : संगमनेर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी ७.४०

विरार दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर

मुंबई : विरार भागात एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झालेला आहे, याबद्दल मुख्यमंत्री

Dagdusheth Halwai Ganpati Atharvashirsha : दगडूशेठ गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे एकत्रित अथर्वशीर्ष पठण; खासदार सुनेत्रा पवारांचीदेखील खास उपस्थिती

पुणे : गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात पुण्यात भक्तिभाव आणि मंत्रोच्चारांच्या गजरात झाली. शहरातील

गडचिरोली जिल्ह्यात चकमक, एवढे जहाल नक्षलवादी ठार

गडचिरोली : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत चार जहाल

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis : “शिवनेरीवरून शब्द देतो...” मनोज जरांगे पाटलांचा फडणवीसांना थेट इशारा!

पुणे : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे, या प्रमुख मागणीसाठी अंतरवाली सराटीतून २७ ऑगस्ट रोजी मुंबईच्या

विरार इमारत दुर्घटना, मृतांचा आकडा १५ वर

वसई: वसई तालुक्याच्या विरार येथील नारंगी रोडवरील रमाबाई अपार्टमेंट इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा