Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी १५ दिवसांत ४४ लाख महिलांचे ऑनलाईन अर्ज

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये (Mukhyamantri Ladaki Bahin Yojana) १५ दिवसांत तब्बल ४४ लाख महिलांनी ऑनलाइन पद्धतीने (online) अर्ज (applications) केले आहेत. तर ऑफलाइन पद्धतीने अर्ज केलेल्या महिलांचा आकडा लवकरच समोर येईल, अशी माहिती राज्याच्या महिला आणि बालकल्याण विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी दिली. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत.


एक जुलै २०२४ पासून या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. तर ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत असणार आहे. या योजनेसाठी राज्य सरकार दरवर्षी तब्बल ४६ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.


या योजनेचा २१ ते ६५ वयोगटातील महिला लाभ घेऊ शकणार आहेत. ही योजना गरीब महिलांसाठी असणार असून, पिवळं आणि केशरी रेशनकार्ड धारकांना याचा लाभ होणार आहे. ३.५० कोटी महिलांना फायदा होण्याची आशा आहे. दरम्यान, लाभार्थीचे वर्षाला उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा कमी असावे, अशी अट आहे.

Comments
Add Comment

शतप्रतिशत भाजपसाठी रणनीती; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची राज्यस्तरीय संचालन समिती जाहीर

महत्वाच्या पदांवर अनुभवी नेतृत्व; विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र संपर्क प्रमुख केशव उपाध्ये, नवनाथ बन यांच्यावर

Jalna Crime : 'तेच घडलं ज्याची भीती होती!' सख्या दीर-भावजयच्या 'लफड्याची' गावभर चर्चा; अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा निर्घृण खून, बदनापूर परिसरात खळबळ

जालना : अनैतिक प्रेमसंबंधात (Illegal Relationship) अडथळा ठरणाऱ्या सख्ख्या भावाचा दुसऱ्या भावानेच काटा काढल्याची एक धक्कादायक

Chhatrapati Sambhaji Nagar : गाझा मदतीच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेशी खेळ? QRने गोळा केलेले लाखो रुपये थेट परदेशात; एटीएसकडून एकाला अटक, काय घडतंय नेमकं?

छत्रपती संभाजी नगर : गाझा-पॅलेस्टाईन येथे सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या मदतीच्या

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे