Scholarship Exam Result : शिष्यवृत्ती परीक्षेत २१४ शाळांना भोपळा!

शिक्षण विभाग अ‍ॅक्शन मोडवर; शिक्षकांवर कारवाईचा बडगा


पुणे : राज्य सरकारकडून (State Government) इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा (Scholarship Exam) घेण्यात येते. नुकत्याच पाचवीच्या स्कॉलरशिप परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत २००हून अधिक शाळांना भोपळा मिळाला आहे. यामुळे संतापलेला शिक्षण विभाग (Education Department) अॅक्शन मोडवर (Action Mode) आला असून शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, इयत्ता पाचवीच्या वर्गातील मुला मुलींसाठी शिष्यवृत्तीची परीक्षा घेण्यात आलेल्या परीक्षेत पुणे जिल्हा परिषदेच्या (Pune Zilla Parishad School) तब्बल २१४ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. या निकालाबाबत शिक्षण विभागात तीव्र संताप पसरला असून संबंधित शिक्षकांविरोधात गंभीर दखल घेतल्याचे समोर आले आहे.


राज्य सरकारकडून घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी तयार करणे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करण्याची जबाबदारी ही शिक्षकांची असते. मात्र शिक्षकांनी विद्यार्थ्यांना याबाबत शिकवलेच नाही. त्यामुळे याप्रकरणी शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच समाधानकारक खुलासा न मिळाल्यास संबंधितांची एक वेतनवाढ रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे.



शिक्षकांवर कारवाईचा बडगा


पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ३ हजार ६२१ इतक्या शाळा आहेत. त्यापैकी पाचवी इयत्तेच्या ९३२ शाळा आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत सहभागी होणे गरजेचे होते. परंतु जिल्ह्यातील १०९ शाळांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरले नसल्याचे समोर आले. त्यामुळे पुणे विभागात मोठ्या प्रमाणात शाळांचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल शून्य टक्के लागला आहे. या कारणामुळे शिक्षण विभागाने संबंधित शाळेच्या शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे