Scholarship Exam Result : शिष्यवृत्ती परीक्षेत २१४ शाळांना भोपळा!

शिक्षण विभाग अ‍ॅक्शन मोडवर; शिक्षकांवर कारवाईचा बडगा


पुणे : राज्य सरकारकडून (State Government) इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा (Scholarship Exam) घेण्यात येते. नुकत्याच पाचवीच्या स्कॉलरशिप परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत २००हून अधिक शाळांना भोपळा मिळाला आहे. यामुळे संतापलेला शिक्षण विभाग (Education Department) अॅक्शन मोडवर (Action Mode) आला असून शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, इयत्ता पाचवीच्या वर्गातील मुला मुलींसाठी शिष्यवृत्तीची परीक्षा घेण्यात आलेल्या परीक्षेत पुणे जिल्हा परिषदेच्या (Pune Zilla Parishad School) तब्बल २१४ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. या निकालाबाबत शिक्षण विभागात तीव्र संताप पसरला असून संबंधित शिक्षकांविरोधात गंभीर दखल घेतल्याचे समोर आले आहे.


राज्य सरकारकडून घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी तयार करणे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करण्याची जबाबदारी ही शिक्षकांची असते. मात्र शिक्षकांनी विद्यार्थ्यांना याबाबत शिकवलेच नाही. त्यामुळे याप्रकरणी शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच समाधानकारक खुलासा न मिळाल्यास संबंधितांची एक वेतनवाढ रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे.



शिक्षकांवर कारवाईचा बडगा


पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ३ हजार ६२१ इतक्या शाळा आहेत. त्यापैकी पाचवी इयत्तेच्या ९३२ शाळा आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत सहभागी होणे गरजेचे होते. परंतु जिल्ह्यातील १०९ शाळांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरले नसल्याचे समोर आले. त्यामुळे पुणे विभागात मोठ्या प्रमाणात शाळांचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल शून्य टक्के लागला आहे. या कारणामुळे शिक्षण विभागाने संबंधित शाळेच्या शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

Comments
Add Comment

New structure of Shaktipeeth Highway : शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या संरचनेत सिंधुदुर्गमधील १० गावांचा समावेश

मुंबई : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला काही भागांतून होणारा शेतकऱ्यांचा तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य

Samarjeetsinh Ghatge : समरजितसिंह घाटगे पुन्हा भाजपमध्ये

रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हाती घेतले कमळ; हसन मुश्रीफ यांच्यासोबतचे वैर संपल्याची दिली माहिती मुंबई :

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात