Scholarship Exam Result : शिष्यवृत्ती परीक्षेत २१४ शाळांना भोपळा!

  81

शिक्षण विभाग अ‍ॅक्शन मोडवर; शिक्षकांवर कारवाईचा बडगा


पुणे : राज्य सरकारकडून (State Government) इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा (Scholarship Exam) घेण्यात येते. नुकत्याच पाचवीच्या स्कॉलरशिप परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत २००हून अधिक शाळांना भोपळा मिळाला आहे. यामुळे संतापलेला शिक्षण विभाग (Education Department) अॅक्शन मोडवर (Action Mode) आला असून शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, इयत्ता पाचवीच्या वर्गातील मुला मुलींसाठी शिष्यवृत्तीची परीक्षा घेण्यात आलेल्या परीक्षेत पुणे जिल्हा परिषदेच्या (Pune Zilla Parishad School) तब्बल २१४ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. या निकालाबाबत शिक्षण विभागात तीव्र संताप पसरला असून संबंधित शिक्षकांविरोधात गंभीर दखल घेतल्याचे समोर आले आहे.


राज्य सरकारकडून घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी तयार करणे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करण्याची जबाबदारी ही शिक्षकांची असते. मात्र शिक्षकांनी विद्यार्थ्यांना याबाबत शिकवलेच नाही. त्यामुळे याप्रकरणी शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच समाधानकारक खुलासा न मिळाल्यास संबंधितांची एक वेतनवाढ रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे.



शिक्षकांवर कारवाईचा बडगा


पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ३ हजार ६२१ इतक्या शाळा आहेत. त्यापैकी पाचवी इयत्तेच्या ९३२ शाळा आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत सहभागी होणे गरजेचे होते. परंतु जिल्ह्यातील १०९ शाळांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरले नसल्याचे समोर आले. त्यामुळे पुणे विभागात मोठ्या प्रमाणात शाळांचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल शून्य टक्के लागला आहे. या कारणामुळे शिक्षण विभागाने संबंधित शाळेच्या शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

Comments
Add Comment

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या