Fitness: वजन कमी करण्यासाठी कधी करावे वर्कआऊट, जाणून घ्या योग्य वेळ

मुंबई: वजन नियंत्रित करण्यासाठी वर्कआऊट करणे गरजेचे आहे. अधिकतर लोक सकाळी अथवा संध्याकाळी जिममध्ये जात अथवा घरी एक्सरसाईज करतात. मात्र फार कमी लोकांना वर्कआऊट करण्याची योग्य वेळ माहीत आहे. सकाळी की संध्याकाळी कोणत्या वेळेस वर्कआऊट केले पाहिजे. ज्यामुळे वजन वेगाने कमी होईल.



वर्कआऊट करण्याची योग्य वेळ


वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी वर्कआऊट केल्याने शरीरातील फॅट अधिक बर्न होते. यामुळे मेटाबॉलिज्मही चांगला राहतो. सकाळी-सकाळी रिकाम्या पोटी एक्सरसाईज केल्याने वजन दुपटीने कमी होते.



सकाळी किती वाजता वर्कआऊट करावे


तज्ञांच्या मते सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत केला जाणारा व्यायाम चांगला ठरू शकतो. यामुळे संपूर्ण दिवसभर एनर्जेटिक राहता येते. सकाळी एक्सरसाईज केल्याने हॉर्ट रेट वाढतो. तसेच रक्ताभिसरण प्रक्रिया वेगाने होते. यामुळे शरीराचे तापमानही नियंत्रित राहण्यास मदत होते.



संध्याकाळी व्यायाम करावा की नाही


तज्ञांच्या मते दिवसभर काम केल्यानंतर शरीराचे तापमान वाढलेले असते. अशातच वजन कमी कऱण्यासाठी वर्कआऊट करत असाल तर याचा परिणाम चांगला मिळू शकतो. दरम्यान, संध्याकाळी एक्सरसाईज करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे आपले पोट रिकामी असले पाहिजे. यामुळे फॅट कमी होण्यास मदत होते.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे