Dengue : नाशकात डेंग्यूचे थैमान! आठवड्याभरात १०० हून अधिक जणांना प्रादुर्भाव

नाशिक : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये (Maharashtra Rain) पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, हिवताप असे अनेक आजार डोकावत असतात. अशातच नाशिक शहरात (Nashik News) डेंग्यूच्या (Dengue) साथीने थैमान घातल्याचे चित्र दिसून येत आहे. नाशिकमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या प्रकरणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभाग (Health Department) सतर्क झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात नाशिकमध्ये डेंग्यूचे ९६ रुग्ण आढळले होते. त्यानंतर आता पुन्हा तब्बल १०४ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. यामध्ये सिडको विभागात ३७ रुग्ण तर नाशिकरोड विभागात २२ रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर नाशिक पूर्व आणि पंचवटी विभागात प्रत्येकी १६ रुग्ण, नाशिक पश्चिममध्ये ११ तर सातपूर विभागात १० रुग्ण आढळून आले आहेत. यासोबत डेंग्यूच्या एकूण रुग्णसंख्येचा आकडा ४६९ वर पोहोचला आहे. सध्या रुग्णांवर सरकारी तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


दरम्यान, डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभागाकडून शहरातील विविध भागात सातत्याने तपासणी करण्यात येत आहे. मात्र तरीही डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यास आरोग्य विभाग अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.



डेंग्यूची लक्षणे


डेंग्यू ताप आल्यानंतर सुरुवातीला रुग्णाला अचानक थंडी वाजून येते. याशिवाय डोकेदुखी, अंगदुखी, हाडं आणि सांध्यांमध्ये वेदना जाणवू लागतात. अशक्तपणा, मळमळ, अंगावर सूज आणि पुरळ येणे, नाकातून किंवा हिरड्यांमधून रक्तस्राव, अशी लक्षणे दिसतात. ही लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन