Sudhir Mungantiwar : ३३ कोटी वृक्षलागवडीच्या प्रकरणात सुधीर मुनगंटीवारांना 'क्लीन चीट’

नागपूर : राज्यातील देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) सरकारच्या काळात भाजपा नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला होता. सुधीर मुनगंटीवार यांनी ३३ कोटी वृक्षलागवडीची महत्त्वाकांक्षी मोहिमेची घोषणा केली होती. मात्र या मोहिमेत गैरव्यवहार झाल्याचा (Tree Planting Campaign Scam) आरोप माविआच्या नेत्यांनी केला होता. मात्र या प्रकरणी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ‘क्लीन चीट’ देण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत समितीने दिलेल्या अहवालानुसार मुनगंटीवार यांनी कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार केला नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना या प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळातील वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ३३ कोटी वृक्षलागवड या महत्त्वाकांक्षी मोहिमेची घोषणा केली होती. मात्र त्यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावर आक्षेप घेऊन मुनगंटीवारांवर आरोप केला होता. त्या प्रकरणाबाबत सखोल चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती. त्यानंतर समितीने केलेल्या चौकशीनुसार मुनगंटीवार यांच्याकडून कुठलीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झाला नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्यासोबतच राज्यात ही मोहिम यशस्वी झाल्याचेही समितीने सांगितले आहे. त्यामुळे समितीकडून मविआने केलेले आरोप फेटाळून सुधीर मुनगंटीवारांना क्लीन चीट देण्यात आली आहे.



समितीच्या अहवालात काय म्हटले?



  • या प्रकरणात सखोल चौकशी केली असता कुठलिही अनियमितता किंवा गैरव्यवहार झालेला नसल्याचे आढळून आले आहे.

  • राज्यात मोहिम यशस्वी झाल्याचे समितीचे स्पष्ट मत आहे.

  • मोहिम राबवताना काही अडचणी आणि त्रुटी राहिल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

  • त्रुटी आणि अडचणी दूर करण्यासाठी सुधारणा करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

  • लहान रोपट्यांऐवजी मोठी रोपटी लावण्याची यात शिफारस करण्यात आली आहे.

  • या मोहिमेमुळे राज्यात ५२ कोटी वृक्ष लागल्याची जमेची बाजू मांडण्यात आली आहे.

  • खाणींच्या परिसरात झाडे लावण्याची शिफारसही समितीने या अहवालात केली आहे.

Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे-संभाजीनगर प्रवास दोन तासांत; मुंबई-बेंगळुरू अंतर पाच तासांत

पुणे : पुणे ते संभाजीनगर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवीन उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे हे

Governor Jishnu Dev Verma : विद्यापीठांनी शिक्षणासह कौशल्यांचे एकत्रिकरण करणे आवश्यक - राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पुणे : कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ

Navneet Rana : अमरावतीतील हनुमान गढीवर राणा दांपत्याचे हनुमान चालीसा पठण; उद्धव ठाकरेंना दिले खुले निमंत्रण

ठाकरेंनी अमरावतीत येऊन हनुमान चालीसा वाचावी; राणा दांपत्याचे थेट आव्हान अमरावती : उबाठा यांच्या रामरक्षा

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्य

Maharashtra Corona Alert : कोरोनाची पुन्हा चाहूल? महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

मुंबई : कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी

Dhule Accident : परतीचा प्रवास अर्ध्यावरच ! नाशिकच्या कुटुंबाचा धुळ्यात भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू , ५ गंभीर

Dhule Mumbai Agra Highway accident : नाशिकच्या एका कुटुंबाचा परतीचा प्रवास अपूर्णच राहिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अजमेर येथे