WCL 2024 Final: टीम इंडियाने पाकिस्तानला पुन्हा धुतले, लीजेंड्स लीग फायनलमध्ये दिली मात

मुंबई: भारताने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सच्या पहिल्या हंगामाचा खिताब जिंकला आहे. युवराज सिंगच्या नेतृत्वात इंडियन चॅम्पियन्सने १३ जुलैला एजबेस्टन, बर्मिंगहॅम येथे खेळवण्यात आलेल्या फायनल सामन्यात पाकिस्तान चॅम्पियन्सला ५ विकेटनी हरवले.


पाकिस्तानचा कर्णधार युनिस खानने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांच्या संघाने २० षटकांत ६ बाद १५६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने हे आव्हान १९,१ षटकांत पूर्ण केले. अंबाती रायडूने ३० बॉलमध्ये ५० धावा ठोकल्या आणि भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.


आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारताची सुरूवात चांगली झाली. सलामी फलंदाज रॉबिन उथप्पा आणि रायडू यांनी पॉवरप्लेमध्ये पाकिस्तानच्या गोलंदाजांचा चांगलाच सामना केला. रायडूने पहिल्या ओव्हरमध्ये आमिर यामीनला चौकार-षटकार लगावत धमाकेदार सुरूवात केली.


 


पहिल्या विकेटसाठी रॉबिन उथप्पा आणि अंबाती रायडू यांनी ३४ धावांची भागीदारी केली. उथप्पा ८ बॉलमध्ये १० धावा करून परतला. त्यानंतर अंबाती रायडू आणि गुरकिरत सिंह मान यांनी काळी वेळ भागीदारी केली. १२व्या षटकांत इंडिया चॅम्पियन्सला तिसरा झटका बसला. रायडू ३० बॉलमध्ये ५० धावा करून बाद झाला.


त्यानंतर गुरकिरत ३४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर संघाला पाचवा झटका १५० धावांवर बसला. येथे युसुफ पठाण बाद झाला. तो १९व्या षटकांत दुसऱ्या बॉलवर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर कर्णधार युवराज सिंहने नाबाद १५ आणि इरफान पठाणने नाबाद ५ धावांची खेळी करत भारताला विजयपथावर आणले.

Comments
Add Comment

सामन्याच्या अंतिम क्षणी केवळ बायबलच्या त्या ओळी म्हटल्या, विजयानंतर भावूक झाली जेमिमा

नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाला महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात धूळ चारल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सच्या डोळ्यात

भारत वि ऑस्ट्रेलिया दुसरा टी-20 सामना मेलबर्नमध्ये रंगणार

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे खेळवला

IND W vs AUS W : भारतीय संघ दिमाखात फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाला केले चारीमुंड्या चीत, आता द. आफ्रिकेशी होणार लढत

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात भारताने बलाढ्य

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल