Vishalgad Encroachment : विशाळगडावर अतिक्रमण हटाव मोहिमेला हिंसक वळण!

Share

स्थानिकांना मारहाण, दगडफेक झाल्याचा आरोप

संभाजीराजेंच्या भूमिकेवर हिंदुत्ववादी संघटनांचा आक्षेप

कोल्हापूर : संभाजी राजे छत्रपती यांनी विशाळगडावरील अतिक्रमण हटवा मोहिमेसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ते आज विशाळगडाकडे (Vishalgad) शेकडो कार्यकर्त्यांसह रवाना झाले. मात्र, या मोहिमेला हिंसक वळण लागलं आहे. विशाळगडावरील स्थानिकांवर हल्ला झाल्याचा प्रकार घडला आहे. इतकेच नव्हे तर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांवर सुद्धा हल्ला झाल्याचा आरोप होत आहे. दगडफेकीचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत.

संभाजी राजे छत्रपती यांनी पोलिसांनी गडाकडे जाऊ नका, असं आवाहन केलं आहे. संभाजीराजे यांनी विशाल गडाकडे कोणत्याही परिस्थितीत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आज सकाळी तुळजाभवानीचे दर्शन घेत ते विशाळगडाकडे रवाना झाले. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते, जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली.

काय म्हणाले संभाजी राजे छत्रपती?

दरम्यान, आयुष्यातील पहिला गुन्हा विशाळगडावर जात आहे म्हणून दाखल झाल्यास मला अभिमानच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आम्ही विशाळगडावर पोहोचत आहोत. ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असला तरी आम्ही विशाळगडावर जाणारच, असे राजे यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे, स्वराज्य संघटनेचे उपाध्यक्ष अंकुश कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या किल्ल्याने संकटात मदत केली तोच विशाळगड किल्ला संकटात आहे, आज विशाळगडाचे अतिक्रमण मुक्त करणारच, असे म्हटले आहे.

संभाजीराजेंच्या भूमिकेवर हिंदुत्ववादी संघटनांचा आक्षेप

दुसरीकडे संभाजी राजे यांनी घेतलेल्या भूमिकेवर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना संभाजी राजे हे आंदोलन का करत आहेत, हे अनाकलनीय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. संभाजीराजेंनी याबाबत राजकारण न करता राज्यातील सर्व गडावरील अतिक्रमण मुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि विशाळगडावर अतिक्रमण प्रशासनाने काढावीत. अन्यथा वक्फ बोर्डाच्या जमिनीवरच हिंदुत्ववादी संघटना मंदिर बांधतील, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील यांनी दिला आहे.

पर्यटकांना आणि भाविकांना गडावर जाण्यास मनाई

किल्ले विशाळगडावर कोणताही अनुचित प्रकार घडून यासाठी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांना आणि भाविकांना गडावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अमोल शेडगे यांनी शनिवारी रात्री सुद्धा शिवभक्तांना सहकार्य करण्याचा आवाहन केलं होतं. तसेच संभाजीराजे यांना चर्चेचं आवाहन केलं होतं. मात्र, संभाजी राजे यांनी चर्चेस नकार दिला आहे.

Recent Posts

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर; व्यापार करार, आयात शुल्क आणि चीनच्या आव्हानाबाबात होणार चर्चा

नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…

51 minutes ago

KKR vs GT, IPL 2025: इडन गार्डनवर कोलकत्ता गुजरातला रोखणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…

58 minutes ago

साहित्यभूषण पुरस्कारासाठी आता दहा लाख रुपये देणार : उदय सामंत

रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…

2 hours ago

मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली

नागपूर:  विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…

3 hours ago

नॅशनल पार्कमधील मिनी ट्रेन सुरू होणार

बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…

3 hours ago

मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात ६२६ अर्ज

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…

4 hours ago