Vishalgad Encroachment : विशाळगडावर अतिक्रमण हटाव मोहिमेला हिंसक वळण!

स्थानिकांना मारहाण, दगडफेक झाल्याचा आरोप


संभाजीराजेंच्या भूमिकेवर हिंदुत्ववादी संघटनांचा आक्षेप


कोल्हापूर : संभाजी राजे छत्रपती यांनी विशाळगडावरील अतिक्रमण हटवा मोहिमेसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ते आज विशाळगडाकडे (Vishalgad) शेकडो कार्यकर्त्यांसह रवाना झाले. मात्र, या मोहिमेला हिंसक वळण लागलं आहे. विशाळगडावरील स्थानिकांवर हल्ला झाल्याचा प्रकार घडला आहे. इतकेच नव्हे तर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांवर सुद्धा हल्ला झाल्याचा आरोप होत आहे. दगडफेकीचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत.


संभाजी राजे छत्रपती यांनी पोलिसांनी गडाकडे जाऊ नका, असं आवाहन केलं आहे. संभाजीराजे यांनी विशाल गडाकडे कोणत्याही परिस्थितीत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आज सकाळी तुळजाभवानीचे दर्शन घेत ते विशाळगडाकडे रवाना झाले. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते, जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली.



काय म्हणाले संभाजी राजे छत्रपती?


दरम्यान, आयुष्यातील पहिला गुन्हा विशाळगडावर जात आहे म्हणून दाखल झाल्यास मला अभिमानच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आम्ही विशाळगडावर पोहोचत आहोत. ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असला तरी आम्ही विशाळगडावर जाणारच, असे राजे यांनी म्हटले आहे.


दुसरीकडे, स्वराज्य संघटनेचे उपाध्यक्ष अंकुश कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या किल्ल्याने संकटात मदत केली तोच विशाळगड किल्ला संकटात आहे, आज विशाळगडाचे अतिक्रमण मुक्त करणारच, असे म्हटले आहे.



संभाजीराजेंच्या भूमिकेवर हिंदुत्ववादी संघटनांचा आक्षेप


दुसरीकडे संभाजी राजे यांनी घेतलेल्या भूमिकेवर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना संभाजी राजे हे आंदोलन का करत आहेत, हे अनाकलनीय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. संभाजीराजेंनी याबाबत राजकारण न करता राज्यातील सर्व गडावरील अतिक्रमण मुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि विशाळगडावर अतिक्रमण प्रशासनाने काढावीत. अन्यथा वक्फ बोर्डाच्या जमिनीवरच हिंदुत्ववादी संघटना मंदिर बांधतील, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील यांनी दिला आहे.



पर्यटकांना आणि भाविकांना गडावर जाण्यास मनाई


किल्ले विशाळगडावर कोणताही अनुचित प्रकार घडून यासाठी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांना आणि भाविकांना गडावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अमोल शेडगे यांनी शनिवारी रात्री सुद्धा शिवभक्तांना सहकार्य करण्याचा आवाहन केलं होतं. तसेच संभाजीराजे यांना चर्चेचं आवाहन केलं होतं. मात्र, संभाजी राजे यांनी चर्चेस नकार दिला आहे.


Comments
Add Comment

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई

शेतकऱ्यांसाठी मंत्री महाजनांचा मोठा निर्णय, सुपूर्द केला वर्षभराचा ‘पगार’

जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी मंत्री गिरीश महाजन यांनी

अमरावती महानगरपालिकेला ई-बस डेपो-व चार्जींग सुविधेसाठी बडनेरा येथील जमीन

अमरावती : अमरावती महापालिकेला केंद्र शासन पुरस्कृत पी.एम.ई बस योजनेतून मिळालेल्या ई-बस डेपो व चार्जींग

दिवाळीच्या सुट्टीत फिरण्याचे नियोजन करताय ? 'या' चार जागांना नक्की भेट द्या

मुंबई : पावसाळ्यातली हिरवळ अनुभवल्यानंतर आता गुलाबी थंडीची चाहुल सर्वांना लागली आहे. त्यामुळे छान थंड हवेच्या

अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांकडून तब्बल ३१,६२८ कोटींची मदत; २५३ तालुक्यांना सरसकट मदत देणार

'खरडून गेलेल्या जमिनीला' मिळणार हेक्टरी ३.४७ लाखांची मदत; शेतकरी, घरे आणि जनावरांसाठी भरीव निधी मुंबई: