मुंबई: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाचवा टी-२० सामना भारताने ४२ धावांनी जिंकला आहे. टीम इंडियाने या विजयासह मालिकाही जिंकली आहे. भारताने ही मालिका ४-१ने जिंकली. टीम इंडियाने पहिल्यांदा बॅटिंग करताना १६७ धावा केल्या. या दरम्यान संजू सॅमसनने अर्धशतक ठोकले,
त्याने ४५ चेंडूंचा सामना करताना ५८ धावा केल्या. सॅमसनने या खेळी दरम्यान ४ षटकार आणि एक चौकार ठोकला. रियान परागने २२ धावांची खेळी केली. शिवम दुबेने २६ धावा केल्या.
भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या झिम्बाब्वेच्या संघाला १२५ धावाच करता आल्या. त्यांच्याकडून फराज अकरमने १३ बॉलमध्ये २७ धावा केल्या. मेयर्सने ३४ धावांची खेळी केली. मरूमानीने २७ धावा केल्या.
भारताच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने २२ धावा देत सर्वाधिक ४ विकेट मिळवल्या. याशिवाय शिवम दुबेने २ विकेट मिळवल्या. तुषार देशपांडे, अभिषेक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…