IND vs ZIM: टीम इंडियाने झिम्बाब्वेला ४२ धावांनी हरवले, मालिकेत ४-१ ने विजय

  69

मुंबई: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाचवा टी-२० सामना भारताने ४२ धावांनी जिंकला आहे. टीम इंडियाने या विजयासह मालिकाही जिंकली आहे. भारताने ही मालिका ४-१ने जिंकली. टीम इंडियाने पहिल्यांदा बॅटिंग करताना १६७ धावा केल्या. या दरम्यान संजू सॅमसनने अर्धशतक ठोकले,


त्याने ४५ चेंडूंचा सामना करताना ५८ धावा केल्या. सॅमसनने या खेळी दरम्यान ४ षटकार आणि एक चौकार ठोकला. रियान परागने २२ धावांची खेळी केली. शिवम दुबेने २६ धावा केल्या.


भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या झिम्बाब्वेच्या संघाला १२५ धावाच करता आल्या. त्यांच्याकडून फराज अकरमने १३ बॉलमध्ये २७ धावा केल्या. मेयर्सने ३४ धावांची खेळी केली. मरूमानीने २७ धावा केल्या.


भारताच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने २२ धावा देत सर्वाधिक ४ विकेट मिळवल्या. याशिवाय शिवम दुबेने २ विकेट मिळवल्या. तुषार देशपांडे, अभिषेक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार