Ashadhi Wari : विठुरायाच्या भक्तांसाठी आनंदवार्ता! वारकऱ्यांच्या सेवेसाठी ‘मागेल तिथे बस’ची योजना

मालेगावहून पंढरपूरसाठी सुटणार ६८ जादा बस


मालेगाव : यंदा विठुरायाचा आषाढी वारीचा (Ashadhi Ekadashi 2024) सोहळा १७ जुलै रोजी पंढरीत रंगणार आहे. त्यानिमित्ताने प्रशासनाने देखील जय्यत तयारी केली आहे. मानाच्या पालख्या पंढरीच्या (Pandharpur) दिशेने निघाल्या आहेत. पंढरपूर येथे आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक-प्रवासी येतात. अनेक प्रवासी स्वतःच्या खाजगी वाहनाने, रेल्वेने, एसटीने अथवा विविध पालखींबरोबर चालत दिंडीने येतात. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल भक्तांना पंढरपुरात पोहोचणे सोपे व्हावे, यासाठी मालेगाव येथून विशेष बस सेवा (Special Bus) सुरु केली आहे. त्यामुळे भक्तांना आता सहजरित्या मालेगावहून थेट पंढरपूर गाठता येणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासनाने अनेक ठिकाणाहून वारकऱ्यांच्या सेवेसाठी बससेवा सुरु केल्या आहेत. त्याचप्रमाणे मालेगाव आगाराने वारकऱ्यांच्या सेवेसाठी ‘मागेल तिथे बस’ अशी बससेवा सुरु केली आहे. पंढरपूरला जाणारे ४४ प्रवासी एकत्र आल्यास ही बस सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.



७५ वर्षांपुढील नागरिकांसाठी मोफत प्रवास


वारकऱ्यांच्या व प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी मालेगाव आगारातर्फे समूहाने ४४ प्रवाशी एकत्र आल्यास थेट त्या गावातून पंढरपूर वारीसाठी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्या गावापासून बस मार्गस्थ होईल तेथून तिकिटाची आकारणी केली जाईल. बस मनमाड, शिर्डी, अहिल्यादेवी नगरमार्गे पंढरपूरला पोहोचेल. मालेगाव ते पंढरपूर प्रवासासाठी एका प्रौढ व्यक्तीला ५५० रुपये तिकीट द्यावे लागेल. महिला व मुलांसाठी २७५ रुपये तिकीट दर असणार आहेत. तर ७५ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सवलत मिळेल.



असे असेल बसचे नियोजन



  • १३ जुलै ४ बस

  • १४ जुलै ७ बस

  • १५ जुलै १५ बस

  • १६ जुलै १५ बस

  • १७ जुलै १५ बस

  • १८ जुलै ४ बस

  • १९ जुलै ४ बस

  • २० जुलै ४ बस

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये