Nawab Malik : नवाब मलिक पुन्हा तुरुंगात जाणार? आज जामिनाचा अखेरचा दिवस!

सुप्रीम कोर्टात आज पार पडणार सुनावणी


मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या जामिनाचा आज शेवटचा दिवस आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेल्या नवाब मलिकांना आजारपणाच्या कारणास्तव जामीन मंजूर करण्यात आला होता. ते तुरुंगात असताना त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) फूट पडली होती. बाहेर आल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) व अजित पवार (Ajit Pawar) दोन्ही गटाच्या नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. अनेक दिवस मलिक आपली भूमिका स्पष्ट करु शकले नव्हते. अखेर त्यांनी अजितदादांना साथ देण्याचा निर्णय घेतला. यानंतर आज नवाब मलिकांच्या जामिनावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे मलिक तुरुंगात जाणार की त्यांच्या जामिनात मुदतवाढ होणार याच फैसला आज होणार आहे.


मुदतवाढ मिळण्यासाठी नवाब मलिक यांनी सुप्रीम कोर्टाकडे अर्ज दाखल केला आहे. मात्र, आज सुप्रीम कोर्टाकडून मुदतवाढ न मिळाल्यास त्यांना पुन्हा जेलमध्ये जावं लागणार आहे. न्यायमूर्ती बेला त्रिवेदी आणि सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडणार असून कोर्ट नंबर १४ मध्ये आज ६१ व्या नंबर वर सुनावणी आहे. अशातच नवाब मलिक आज विधान परिषदेसाठी मतदान करणार की नाही? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.



नेमकं प्रकरण काय?


नवाब मलिक यांना ईडीने २०२२ मध्ये गोवावाला कंपाऊंड प्रकरणात मनी लाँड्रिंग कायद्याखाली अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात होते. नंतर ऑगस्ट २०२३ मध्ये ते अटीशर्तीसह जामिनावर तुरुंगातून बाहेर आले होते. प्रकृतीचे कारण देत जामीन मिळावा अशी मागणी तेव्हा त्यांनी केली होती. क्रूझ ड्रग्ज प्रकरणादरम्यान मलिक चांगलेच चर्चेत आले होते. या प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आरोपी होता. मात्र एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर मलिक यांनी गंभीर आरोप केले होते. या आरोपांमुळे मलिक तेव्हा चर्चेचा विषय ठरले होते.

Comments
Add Comment

Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात

Mumbai News : मुंबईत पाण्याचा निचरा करण्यासाठी ५४७ पंपांची आणि फिरते डीवॉटरिंग पंप असणाऱ्या १० वाहनांची व्यवस्था

मुंबईत यंदा पाणी साचण्याची फक्त ८० ठिकाणे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची

BMC News : 'मध्य वैतरणा प्रकल्प राबवताना तुमचे पर्यावरण प्रेम कुठे होते?'

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई पाणी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी स्थायी समिती व महापालिका

single-window clearance : लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा

मुंबई : राज्यातील लाईव्ह मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह

Godavari to Narmada : असा होणार गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा समारोप समारंभ

मुंबई : जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या

Seeds Act : राज्याचा स्वतंत्र बियाणे कायदा करणार

मुंबई : शेतकऱ्यांना स्वतःचे बियाणे साठवणे, वापरणे, देवाणघेवाण करणे आणि (ब्रँडेड नाव न वापरता) विक्री करण्यास