Mumbai Rain : मुंबईकरांनो सावधान! 'या' दिवशी कोसळणार पावसाच्या धारा

पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याचा धोका


मुंबई : महाराष्ट्रासह मुंबईत (Mumbai Rain) पावसाने जोर धरला आहे. त्यातच सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा राज्यभरात हजेरी लावली आहे. रात्रभर मुंबईसह अनेक उपनगरांत जोरदार पाऊस झाल्यामुळे रस्त्यांना नदीचे स्वरुप आले आहे. यामुळे पुढील काही दिवस मुंबईकरांसाठी धोक्याचे ठरु शकतात, असा अंदाज हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मुंबईत मध्यम आणि मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तर, पुढच्या आठवड्यात १७,१८ आणि १९ जुलै रोजी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. या पावसामुळे मुंबईत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात पाऊस मुंबईसह उपनगरात धुमाकूळ घालणार असल्यामुळे हवामान विभागाने मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Rain Alert)



'या' जिल्ह्यांना अलर्ट


या आठवड्यातील शुक्रवार, शनिवार आणि रविवार एकूण ३०० मिमी पाऊस पडू शकतो. त्यामुळे शनिवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रविवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना तर सोमवारी, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.


दरम्यान, आज पहाटेदेखील मुसळधार पाऊस बरसत असल्यामुळे हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Air quality monitoring : मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई  : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची

मुंबईत मोहरम मिरवणुकीत १४,९०० विषारी कॅप्सूल जप्त ! ३००० हजार लोकांचे जीव होते धोक्यात ?

Mumbai: मुंबईच्या भायखळा (Byculla) परिसर

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मध्ये रेल्वे मार्गावर १२ नवीन एसी लोकल धावणार; वेळपत्रक आले समोर

Mumbai : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यान एसी लोकलच्या

TET Paper Leak : भिवंडीत दीड कोटींना विकला जात होता टीईटीचा पेपर! पोलिसांच्या 'SIT'कडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

मुंबई : राज्यातील लाखो तरुण-तरुणींच्या भविष्याशी खेळणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य पेपरफुटी रॅकेटचा ठाणे

महापालिकेच्यावतीने पाणी आणि अन्नाची शुद्धता तपासणी

अहवाल आता व्हॉट्सअॅप, ईमेलवर प्राप्त होणार मुंबई : पाणी आणि अन्न हे आपल्या रोजच्या जगण्यातील अविभाज्य घटक आहेत.

Prajakta Lavangare : गृहनिर्माण संस्थांमध्ये कंपोस्ट खत निर्मितीला चालना द्या

अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे यांचे निर्देश मुंबई : स्रोतांच्या ठिकाणीच कचऱ्यावर प्रक्रिया