महाराष्ट्र विधानपरिषदेची आज निवडणूक, ११ जागांसाठी १२ उमेदवार मैदानात

  45

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेच्या(Maharashtra Legislative Council election) ११ जागांसाठी निवडणुकीचे मैदान तयार आहे. या जागांसाठी आज निवडणूक होत आहे. राज्याचे विधानसभा सदस्य दक्षिण मुंबईच्या विधान भवन परिसरात एकत्र होतील.येथे सकाळी ९ वाजल्यापासून ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. मतांची मोजणी संध्याकाळी ५ वाजता केली जाईल. निवडणुकीच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार मैदानात आहेत.


महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या केवळ तीन महिने आधी विधान परिषदेची निवडणूक होत आहे. अशातच सर्व राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. सर्वच पक्षांनी आपला विजय सुनिश्चित करण्यासाठी विविध रणनीती आखल्या आहेत.



११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात


महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपकडून ५ उमेदवार रिंगणात आहेत. यात पंकजा मुंडे, योगेश टिळकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. यासोबतच भाजपचे सहकारी शिंदे गटाच्या शिवसेनेकडून दोन सदस्य माजी लोकसभा सदस्य कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर एनसीपीने शिवाजीराव गरजे आणि राजेश वितेकर यांना तिकीट दिले आहे. राज्यात विरोधी पक्षातील महाविकास आघाडीने ३ उमेदवार उतरवले आहेत.


उद्धव ठाकरेच्या गटाने १, काँग्रेसकडून १ उमेदवार तर शरद पवार गटाने उमेदवार न उतरवता भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना समर्थन दिले आहे.



एका जागेसाठी किती मते गरजेची?


महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. विधानसभेची सध्याची स्ट्रेंथ २७४ आहे. अशातच विधान परिषदेच्या एका जागेवर विजय मिळवण्यासाठी एकूण २३ मते मिळणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment

अशोक नगरमधील पालिकेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप

नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिकेचे दुर्लक्ष कांदिवली : कांदिवली पूर्वेला अशोक नगरमधील एकमेव असलेल्या

पुण्यात भिडे पूल दीड महिना बंद

पुणे : सदाशिवपेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली