महाराष्ट्र विधानपरिषदेची आज निवडणूक, ११ जागांसाठी १२ उमेदवार मैदानात

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेच्या(Maharashtra Legislative Council election) ११ जागांसाठी निवडणुकीचे मैदान तयार आहे. या जागांसाठी आज निवडणूक होत आहे. राज्याचे विधानसभा सदस्य दक्षिण मुंबईच्या विधान भवन परिसरात एकत्र होतील.येथे सकाळी ९ वाजल्यापासून ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. मतांची मोजणी संध्याकाळी ५ वाजता केली जाईल. निवडणुकीच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार मैदानात आहेत.


महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या केवळ तीन महिने आधी विधान परिषदेची निवडणूक होत आहे. अशातच सर्व राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. सर्वच पक्षांनी आपला विजय सुनिश्चित करण्यासाठी विविध रणनीती आखल्या आहेत.



११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात


महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपकडून ५ उमेदवार रिंगणात आहेत. यात पंकजा मुंडे, योगेश टिळकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. यासोबतच भाजपचे सहकारी शिंदे गटाच्या शिवसेनेकडून दोन सदस्य माजी लोकसभा सदस्य कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर एनसीपीने शिवाजीराव गरजे आणि राजेश वितेकर यांना तिकीट दिले आहे. राज्यात विरोधी पक्षातील महाविकास आघाडीने ३ उमेदवार उतरवले आहेत.


उद्धव ठाकरेच्या गटाने १, काँग्रेसकडून १ उमेदवार तर शरद पवार गटाने उमेदवार न उतरवता भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना समर्थन दिले आहे.



एका जागेसाठी किती मते गरजेची?


महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. विधानसभेची सध्याची स्ट्रेंथ २७४ आहे. अशातच विधान परिषदेच्या एका जागेवर विजय मिळवण्यासाठी एकूण २३ मते मिळणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment

पुणेकरांसाठी मनपाचा उपक्रम; 'क्यूआर' स्कॅन करा अन विकासकामे सुचवा

पुणे :  पुणे महापालिकेच्या २०२६-२७ च्या वार्षिक अर्थसंकल्पात पुणेकरांना थेट सहभाग घेता येणार आहे. शहराच्या

'ई-चलान' वसुलीसाठी सक्ती केल्यास पोलिसांवरच होणार कारवाई; पोलीस महासंचालकांचे निर्देश

मुंबई : रस्त्यावरील वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर आकारल्या जाणाऱ्या ‘ई-चलान’च्या दंडाची वसुली करताना

जळगावात मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष दाखवून...

जळगाव: जळगावमध्ये एका मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष देऊन अपघाताचं प्रकरण बनवलं आणि विम्याचे ५० लाख

सरकारने १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांसंदर्भातील दिली मोठी बातमी, काय सांगितलं?

नवी दिल्ली: देशातील चलनात १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांचा तुटवडा आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रोखीचे

जेएनपीए बंदरात कंटेनर अडकलेल्या फळे व भाजीपाला निर्यातदारांना मोठा दिलासा; पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील फळे व भाजीपाला उत्पादक शेतकरी व निर्यातदार यांचे हित लक्षात घेता केंद्र सरकारच्या

लोकनेते बाळासाहेब देसाई यांना ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन; मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

मुंबई: लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम मुंबई येथील मेघदूत