मुंबई: Jio, Airtel आणि Viने आपल्या रिचार्ज प्लान्समध्ये बदल केले आहेत. या सर्व टेलिकॉम कंपन्यांनी या महिन्याच्या सुरूवातीला आपले रिचार्ज प्लान्स महाग केले आहेत. तीनही कंपन्यांनी आपल्या प्लान्सच्या किंमतीत २० ते २७ टक्के वाढ केली आहे. यानंतर ग्राहकांचा खर्च मात्र वाढला आहे.
जर तुम्ही या टेलिकॉम कंपन्यांची सर्व्हिस वापरता तर तुमचा महिन्याचा तसेच वर्षाचा रिचार्जचा खर्च आता वाढणार आहे. टेलिकॉम ऑपरेटर्सने कॉलिंगपासून ते डेटा पर्यंतच्या प्लान्समध्ये बदल केले आहेत. जाणून घेऊया स्वस्त आणि महाग प्लानचे डिटेल्स…
जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक वार्षिक प्लान्स आहेत. दरम्यान, आपण सामान्य प्लानबद्दल बोलूया. कंपनी ३५९९ रूपयांचा प्लान ऑफर करते. यात युजर्सला ३६५ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग, दररोज २.५ जीबी डेटा आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा अॅक्सेस मिळतो.
कंपनी एक स्वस्त पर्यायही देते. तुम्ही १८९९ रूपयांचा प्लान खरेदी करू शकता. यात ३३६ दिवसांची व्हॅलिडिटीसाठी अनलिमिटेड कॉलिंग, २४ जीबी डेटा आणि ३६०० एसएमएसची सुविधा मिळते.
एअरटेलमध्ये ३५९९ रूपयांचा प्लान येतो. यात ३६५ दिवसांसाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज २ जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधा मिळते. या प्लानमध्ये फ्री हॅलो ट्यून, विंक म्युझिकची सुविधा मिळते.
कंपनी १९९९रूपयांचा वार्षिक प्लानही ऑफर करते. यात ३६५ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह अनलिमिटेड कॉलिंग, २४ जीबी डेटा आणि दररोज १०० एसएमएस मिळतात.
या पद्धतीने Viचा ३५९९ रूपयांचा प्लान येतो. यात युजर्सला ८५०जीबी डेटा मिळतो. हा प्लान अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. याशिवाय युजर्सला Binge All Night चाही अॅक्सेस मिळतो. जर तुम्ही स्वस्त प्लानच्या शोधात आहात तर कंपनी १९९९ रूपयांचा प्लान ऑफर करते. यात ३६५ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगसोबत २४ जीबी डेटा आणि ३६०० एसएमएस मिळतात. हा प्लान त्या लोकांसाठी चांगला आहे ज्यांना केवळ कॉलिंग हवे आहे.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…