Jio, Airtel आणि Viचे सगळ्यात स्वस्त रिचार्ज प्लान्स, मिळणार एक वर्षाची व्हॅलिडिटी

  444

मुंबई: Jio, Airtel आणि Viने आपल्या रिचार्ज प्लान्समध्ये बदल केले आहेत. या सर्व टेलिकॉम कंपन्यांनी या महिन्याच्या सुरूवातीला आपले रिचार्ज प्लान्स महाग केले आहेत. तीनही कंपन्यांनी आपल्या प्लान्सच्या किंमतीत २० ते २७ टक्के वाढ केली आहे. यानंतर ग्राहकांचा खर्च मात्र वाढला आहे.


जर तुम्ही या टेलिकॉम कंपन्यांची सर्व्हिस वापरता तर तुमचा महिन्याचा तसेच वर्षाचा रिचार्जचा खर्च आता वाढणार आहे. टेलिकॉम ऑपरेटर्सने कॉलिंगपासून ते डेटा पर्यंतच्या प्लान्समध्ये बदल केले आहेत. जाणून घेऊया स्वस्त आणि महाग प्लानचे डिटेल्स...



जिओचा वार्षिक प्लान


जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक वार्षिक प्लान्स आहेत. दरम्यान, आपण सामान्य प्लानबद्दल बोलूया. कंपनी ३५९९ रूपयांचा प्लान ऑफर करते. यात युजर्सला ३६५ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग, दररोज २.५ जीबी डेटा आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा अॅक्सेस मिळतो.


कंपनी एक स्वस्त पर्यायही देते. तुम्ही १८९९ रूपयांचा प्लान खरेदी करू शकता. यात ३३६ दिवसांची व्हॅलिडिटीसाठी अनलिमिटेड कॉलिंग, २४ जीबी डेटा आणि ३६०० एसएमएसची सुविधा मिळते.



Airtelचा ३६५ दिवसांचा प्लान


एअरटेलमध्ये ३५९९ रूपयांचा प्लान येतो. यात ३६५ दिवसांसाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज २ जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधा मिळते. या प्लानमध्ये फ्री हॅलो ट्यून, विंक म्युझिकची सुविधा मिळते.


कंपनी १९९९रूपयांचा वार्षिक प्लानही ऑफर करते. यात ३६५ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह अनलिमिटेड कॉलिंग, २४ जीबी डेटा आणि दररोज १०० एसएमएस मिळतात.



Viचा ३६५ दिवसांचा रिचार्ज


या पद्धतीने Viचा ३५९९ रूपयांचा प्लान येतो. यात युजर्सला ८५०जीबी डेटा मिळतो. हा प्लान अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. याशिवाय युजर्सला Binge All Night चाही अॅक्सेस मिळतो. जर तुम्ही स्वस्त प्लानच्या शोधात आहात तर कंपनी १९९९ रूपयांचा प्लान ऑफर करते. यात ३६५ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगसोबत २४ जीबी डेटा आणि ३६०० एसएमएस मिळतात. हा प्लान त्या लोकांसाठी चांगला आहे ज्यांना केवळ कॉलिंग हवे आहे.

Comments
Add Comment

Maratha Reservation : मराठा आरक्षण मुद्यावर मध्यरात्री 'वर्षा' बंगल्यावर खलबत! मुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत महत्वाची बैठक

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील आजपासून मुंबईच्या आझाद मैदानावर कडक आमरण उपोषणाला बसणार

ग्रामीण भागातील प्रत्येक रस्त्याला विशिष्ट क्रमांक

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाकांक्षी निर्णय ग्रामीण रस्ते होणार अतिक्रमणमुक्त ! मुंबई :

लालबागच्या राजाचे VIP दर्शन वादाच्या भोवऱ्यात! जनसामान्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप

मुंबई: संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून, राज्यभरातून अनेक लोकं या दिवसात मुंबईत लालबागच्या

आता आणखी किती दिवस?' ऋषभ पंतने सोशल मीडियावर शेअर केली ही पोस्ट

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने आपल्या दुखापतीबद्दल एक मोठी अपडेट दिली आहे.

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा लालबाग राजाच्या दर्शनाला : देशाच्या प्रगतीसाठी केली प्रार्थना

मुंबई : केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी रविवारी मुंबईतल्या गणेश मंडळांना भेट दिली . मुख्यमंत्री देवेंद्र

जरांगे आरक्षण मिळेपर्यंत पाणी पण बंद करणार

मुंबई : ओबीसी कोट्यातून सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी करत मनोज जरांगेंच्या नेतृत्वात त्यांचे