Jio, Airtel आणि Viचे सगळ्यात स्वस्त रिचार्ज प्लान्स, मिळणार एक वर्षाची व्हॅलिडिटी

  423

मुंबई: Jio, Airtel आणि Viने आपल्या रिचार्ज प्लान्समध्ये बदल केले आहेत. या सर्व टेलिकॉम कंपन्यांनी या महिन्याच्या सुरूवातीला आपले रिचार्ज प्लान्स महाग केले आहेत. तीनही कंपन्यांनी आपल्या प्लान्सच्या किंमतीत २० ते २७ टक्के वाढ केली आहे. यानंतर ग्राहकांचा खर्च मात्र वाढला आहे.


जर तुम्ही या टेलिकॉम कंपन्यांची सर्व्हिस वापरता तर तुमचा महिन्याचा तसेच वर्षाचा रिचार्जचा खर्च आता वाढणार आहे. टेलिकॉम ऑपरेटर्सने कॉलिंगपासून ते डेटा पर्यंतच्या प्लान्समध्ये बदल केले आहेत. जाणून घेऊया स्वस्त आणि महाग प्लानचे डिटेल्स...



जिओचा वार्षिक प्लान


जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक वार्षिक प्लान्स आहेत. दरम्यान, आपण सामान्य प्लानबद्दल बोलूया. कंपनी ३५९९ रूपयांचा प्लान ऑफर करते. यात युजर्सला ३६५ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग, दररोज २.५ जीबी डेटा आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा अॅक्सेस मिळतो.


कंपनी एक स्वस्त पर्यायही देते. तुम्ही १८९९ रूपयांचा प्लान खरेदी करू शकता. यात ३३६ दिवसांची व्हॅलिडिटीसाठी अनलिमिटेड कॉलिंग, २४ जीबी डेटा आणि ३६०० एसएमएसची सुविधा मिळते.



Airtelचा ३६५ दिवसांचा प्लान


एअरटेलमध्ये ३५९९ रूपयांचा प्लान येतो. यात ३६५ दिवसांसाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज २ जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधा मिळते. या प्लानमध्ये फ्री हॅलो ट्यून, विंक म्युझिकची सुविधा मिळते.


कंपनी १९९९रूपयांचा वार्षिक प्लानही ऑफर करते. यात ३६५ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह अनलिमिटेड कॉलिंग, २४ जीबी डेटा आणि दररोज १०० एसएमएस मिळतात.



Viचा ३६५ दिवसांचा रिचार्ज


या पद्धतीने Viचा ३५९९ रूपयांचा प्लान येतो. यात युजर्सला ८५०जीबी डेटा मिळतो. हा प्लान अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. याशिवाय युजर्सला Binge All Night चाही अॅक्सेस मिळतो. जर तुम्ही स्वस्त प्लानच्या शोधात आहात तर कंपनी १९९९ रूपयांचा प्लान ऑफर करते. यात ३६५ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगसोबत २४ जीबी डेटा आणि ३६०० एसएमएस मिळतात. हा प्लान त्या लोकांसाठी चांगला आहे ज्यांना केवळ कॉलिंग हवे आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.