जबरदस्त प्लान: १०७ रूपयांमध्ये मिळतेय ३५ दिवसांची व्हॅलिडिटी, ३ जीबी डेटाही

मुंबई: भारत संचार निगम लिमिटेड भारतात ग्राहकांना चांगला प्रीपेड प्लान ऑफर करत आहे. नुकत्याच खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी आपले प्रीपेड आणि पोस्टपेड प्लान्सच्या किंमतीत वाढ केली आहे. यामुळे ग्राहकांना मोबाईल सिम आऊटगोईंग व्हॅलिडिटी अॅक्टिव्ह ठेवण्यासाठीच्या किंमती वाढल्या आहेत. मात्र अशा वेळेस बीएसएनएललकडे १०७ रूपयांचा प्रीपेड प्लान आहे जो ग्राहकांना सर्व्हिस व्हॅलिडिटी आणि अनेक फायदे देत आहे. जाणून घेऊया याचे डिटेल्स


सगळ्यात आधी म्हणजे बीएसएनएचा १०७ रूपयांचा प्लान ३५ दिवसांच्या सर्व्हिस व्हॅलिडिटीसह येतो. आता हा ग्राहकांसाठी सरप्राईज प्लान आहे. असे यासाठी कारण इतर सर्व खासगी दूरसंचार ऑपरेटर ३० दिवसांपेक्षा कमी सर्व्हिस व्हॅलिडिटीसह आपले बेस प्रीपेड प्लान ऑफर करत आहेत.


बीएसएनएल या प्लानसह डेटा बेनेफिटही देत आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी या प्लानसोबत ३ जीबी डेटा आणि २०० मिनिटांचा व्हॉईस कॉलिंग देत आहे. दरम्यान, विशेष म्हणजे बीएसएनएल या प्लानसोबत कोणतेही एसएमएसचे फायदे देत नाही आहे. यात ३५ दिवसांसाठी बीएसएनएल ट्यून अॅक्सेस जरूर मिळेल. या प्लानला तुम्ही फोन पे अथवा गुगल पेच्या माध्यमातून खरेदी करू शकता.


हा एक असा प्रीपेड प्लान आहे जो जबरदस्त आहे. जर तुमच्याकडे सेकंडरी सिम आहे आणि त्याला तुम्हाला अॅक्टिव्ह ठेवायचे आहे तर तुमच्यासाठी हा प्लान चांगला ठरू शकतो. दरम्यान, बीएसएनएलकडे ४जी नाही हे ही तुम्हाला समजावे लागेल. त्यामुळे सर्व्हिस क्वालिटी आणि ओव्हरऑल एक्सपिरियंसमध्ये तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो.

Comments
Add Comment

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा

मतदारयादी सुधारणा हा आयोगाचा विशेषाधिकार

केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण नवी दिल्ली : देशभरात वेळोवेळी मतदारयादी सुधारणा करणे

‘ऑपरेशन सिंदूर’वेळी काँग्रेसकडून पाकिस्तानच्या लष्कराची पाठराखण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल गुवाहाटी : काँग्रेस नेहमीच भारतविरोधी शक्तींच्या पाठीशी उभी राहते आणि

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१