Arvind Kejriwal : केजरीवालांचा अंतरिम जामीन अखेर सुप्रीम कोर्टाकडून मंजूर! मात्र...

नवी दिल्ली : मद्य घोटाळ्याप्रकरणी (Liquor scam case) गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) दिलासा मिळाला आहे. त्यांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. पण त्यांच्या अटकेचं प्रकरण ईडीने सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठाकडे सोपवलं आहे. केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने मोठ्या खंडपीठाकडे पाठवलं आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाचं तीन न्यायाधीशांचं खंडपीठ केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. या प्रकरणात सरन्यायाधीश तीन न्यायाधीशांची नियुक्ती करतील. या प्रकरणाची मोठ्या खंडपीठासमोर सुनावणी होईपर्यंत केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, केजरीवाल सध्या तुरुंगातून बाहेर पडू शकणार नाहीत.



केजरीवाल कोठडीतच का राहणार?


केजरीवाल सध्या सीबीआयच्या कोठडीत आहेत, त्यांना ईडी प्रकरणात जामीन मिळाला आहे. अशा परिस्थितीत ते सध्या तुरुंगातच राहणार आहेत. अरविंद केजरीवाल यांचे वकील विवेक जैन यांनी सांगितलं की, सीबीआय प्रकरणी १८ जुलै रोजी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी आहे. या प्रकरणातील निर्णयानंतरच केजरीवाल बाहेर पडतील की नाही हे कळेल.

Comments
Add Comment

भयंकर धक्कादायक! दिवाळीत 'कार्बाइड गन'मुळे १४ मुलांना कायमचे अंधत्व; १२५ हून अधिक जखमी!

भोपाळ : दरवर्षी दिवाळीला फटाक्यांचे वेगवेगळे ट्रेंड समोर येत असातात, यामध्ये चकरीपासून ते रॉकेटपर्यंत वेगवेगळे

सैन्यासाठी ७९,००० कोटींचे मोठे निर्णय!

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने आज भारतीय

देशभरात मतदार यादी बनवण्याचे मोठे काम सुरू!

पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुडुचेरी, तामिळनाडूत सर्वप्रथम एसआयआर प्रक्रिया नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने देशभरातील

महिला आणि ट्रान्सजेंडरसाठी मोफत प्रवास; काय आहे 'सहेली स्मार्ट कार्ड' योजना?

नवी दिल्ली : भाऊबीजच्या निमित्ताने दिल्ली सरकार महिला आणि ट्रान्सजेंडर लोकांना एक मोठी भेट देणार आहे. आजपासून

तेजस्वी यादव '४२०' आरोपी, त्यांच्याकडे विश्वासार्हताच नाही, बिहारला मोदी-नितीश यांचे 'डबल इंजिन' सरकारच हवे!; रवी शंकर प्रसाद यांचा हल्लाबोल

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप खासदार रवी शंकर प्रसाद यांनी आज महागठबंधनचे

आता विक्रीआधी होणार प्रत्येक औषधाची सखोल तपासणी

नवी दिल्ली : लहान मुलांना खोकला झाल्यावर औषध म्हणून दिल्या जाणाऱ्या कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे मध्य प्रदेशमध्ये २४