Arvind Kejriwal : केजरीवालांचा अंतरिम जामीन अखेर सुप्रीम कोर्टाकडून मंजूर! मात्र...

  77

नवी दिल्ली : मद्य घोटाळ्याप्रकरणी (Liquor scam case) गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) दिलासा मिळाला आहे. त्यांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. पण त्यांच्या अटकेचं प्रकरण ईडीने सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठाकडे सोपवलं आहे. केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने मोठ्या खंडपीठाकडे पाठवलं आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाचं तीन न्यायाधीशांचं खंडपीठ केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. या प्रकरणात सरन्यायाधीश तीन न्यायाधीशांची नियुक्ती करतील. या प्रकरणाची मोठ्या खंडपीठासमोर सुनावणी होईपर्यंत केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, केजरीवाल सध्या तुरुंगातून बाहेर पडू शकणार नाहीत.



केजरीवाल कोठडीतच का राहणार?


केजरीवाल सध्या सीबीआयच्या कोठडीत आहेत, त्यांना ईडी प्रकरणात जामीन मिळाला आहे. अशा परिस्थितीत ते सध्या तुरुंगातच राहणार आहेत. अरविंद केजरीवाल यांचे वकील विवेक जैन यांनी सांगितलं की, सीबीआय प्रकरणी १८ जुलै रोजी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी आहे. या प्रकरणातील निर्णयानंतरच केजरीवाल बाहेर पडतील की नाही हे कळेल.

Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.