यशस्वी जायसवालचा धमाका, येताच तोडला रोहित शर्माचा रेकॉर्ड

  53

मुंबई: यशस्वी जायसवालने बुधवारी मैदानावर येताच धमाका केला. संपूर्ण टी-२० वर्ल्डकपमध्ये बेंचवर बसल्यानंतर यशस्वीने झिम्बाब्वेविरुद्ध मैदानावर उतरताच आपल्या खेळाचा जलवा दाखवला. यशस्वी जायसवालने भारताला वेगवान सुरूवात करून दिली. या दरम्यान त्याने रोहित शर्माचा एक रेकॉर्डही तोडला. यशस्वीने सामन्यात २७ बॉलमध्ये ३६ धावांची खेळी केली.


भारताने झिम्बाब्वेला तिसऱ्या टी-२० सामन्यात २३ धावांनी हरवले. भारतासाठी या सामन्यात सर्वाधिक धावा कर्णधार शुभमन गिलने केल्या. त्याने ६६ धावांची खेळी केली. तर ऋतुराज गायकवाडने ४९ धावा तडकावल्या. यामुळे भारताला झिम्बाब्वेविरुद्ध १८३ धावांची खेळी साकारता आली.


साधारण ४ महिन्यानंतर भारतीय संघासाठी खेळणाऱ्या यशस्वी जायसवालला या सामन्यात जरी अर्धशतकीय खेळी साकारता आली नसली तरी त्याने या दरम्यान एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला.


यशस्वी २०२४मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने या वर्षी तीनही फॉरमॅटमध्ये मिळून ८४८ धावा केल्या. या सामन्याआधी २०२४मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा पहिल्या स्थानावर होता. मात्र आता यशस्वी जायसवाल अव्वल स्थानावर आला आहे.


जगातील इतर क्रिकेटर्सबाबत बोलायचे झाल्यास या यादीत यशस्वी जायसवाल पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर अफगाणिस्तानचा इब्राहिम जादरानआहे. यानंतर कुसल मेंडिसचा नंबर लागतो. तर मेंडिससह रोहित शर्मा संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर आहे.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार