यशस्वी जायसवालचा धमाका, येताच तोडला रोहित शर्माचा रेकॉर्ड

मुंबई: यशस्वी जायसवालने बुधवारी मैदानावर येताच धमाका केला. संपूर्ण टी-२० वर्ल्डकपमध्ये बेंचवर बसल्यानंतर यशस्वीने झिम्बाब्वेविरुद्ध मैदानावर उतरताच आपल्या खेळाचा जलवा दाखवला. यशस्वी जायसवालने भारताला वेगवान सुरूवात करून दिली. या दरम्यान त्याने रोहित शर्माचा एक रेकॉर्डही तोडला. यशस्वीने सामन्यात २७ बॉलमध्ये ३६ धावांची खेळी केली.


भारताने झिम्बाब्वेला तिसऱ्या टी-२० सामन्यात २३ धावांनी हरवले. भारतासाठी या सामन्यात सर्वाधिक धावा कर्णधार शुभमन गिलने केल्या. त्याने ६६ धावांची खेळी केली. तर ऋतुराज गायकवाडने ४९ धावा तडकावल्या. यामुळे भारताला झिम्बाब्वेविरुद्ध १८३ धावांची खेळी साकारता आली.


साधारण ४ महिन्यानंतर भारतीय संघासाठी खेळणाऱ्या यशस्वी जायसवालला या सामन्यात जरी अर्धशतकीय खेळी साकारता आली नसली तरी त्याने या दरम्यान एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला.


यशस्वी २०२४मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने या वर्षी तीनही फॉरमॅटमध्ये मिळून ८४८ धावा केल्या. या सामन्याआधी २०२४मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा पहिल्या स्थानावर होता. मात्र आता यशस्वी जायसवाल अव्वल स्थानावर आला आहे.


जगातील इतर क्रिकेटर्सबाबत बोलायचे झाल्यास या यादीत यशस्वी जायसवाल पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर अफगाणिस्तानचा इब्राहिम जादरानआहे. यानंतर कुसल मेंडिसचा नंबर लागतो. तर मेंडिससह रोहित शर्मा संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर आहे.

Comments
Add Comment

अर्जुन आणि सानियाला दिल्या अमित शाह यांनी खास पत्रातून शुभेच्छा

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या कुटुंबाला विशेष

FIFA 2026 : फिफा २०२६ च्या विश्वचषकातून इराण बाहेर; फिफाने ठोठावला इराणला दंड

- या भ्रष्ट राजवटीने आमच्या नेत्याची हत्या केली, आम्ही कोणत्याही परिस्थितीत विश्वचषकात सहभागी होऊ शकत

IPL 2026 : आयपीएल२०२६ पर्वाचे वेळापत्रक जाहीर; आरसीबी आणि एसआरएचमध्ये होणार सलामीची लढत

मुंबई : आयपीएल २०२६ च्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) १९

अर्जुन पुरस्काराचे मानकरी जलतरणपटू वीरधवल खाडे सरकारी नोकरीत

मुंबई : राज्याचे नाव क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर नेणारे नामवंत जलतरणपटू आणि माजी तहसीलदार वीरधवल खाडे

BCCI कडून विश्वविजेत्या टीम इंडियाला १३१ कोटींचं बक्षिस , परंतु प्रत्यक्षात एवढे पैसे मिळणार

मुंबई: टी२० विश्वचषक २०२६ मधील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर बीसीसीआयकडून बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला

T20 World Cup 2026 : आयसीसी 'टीम ऑफ द टूर्नामेंट'मध्ये चार भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश

आयसीसीने टी-२० साठी सर्वोत्तम संघ निवडला असून या संघात चार भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे. संजू