यशस्वी जायसवालचा धमाका, येताच तोडला रोहित शर्माचा रेकॉर्ड

मुंबई: यशस्वी जायसवालने बुधवारी मैदानावर येताच धमाका केला. संपूर्ण टी-२० वर्ल्डकपमध्ये बेंचवर बसल्यानंतर यशस्वीने झिम्बाब्वेविरुद्ध मैदानावर उतरताच आपल्या खेळाचा जलवा दाखवला. यशस्वी जायसवालने भारताला वेगवान सुरूवात करून दिली. या दरम्यान त्याने रोहित शर्माचा एक रेकॉर्डही तोडला. यशस्वीने सामन्यात २७ बॉलमध्ये ३६ धावांची खेळी केली.


भारताने झिम्बाब्वेला तिसऱ्या टी-२० सामन्यात २३ धावांनी हरवले. भारतासाठी या सामन्यात सर्वाधिक धावा कर्णधार शुभमन गिलने केल्या. त्याने ६६ धावांची खेळी केली. तर ऋतुराज गायकवाडने ४९ धावा तडकावल्या. यामुळे भारताला झिम्बाब्वेविरुद्ध १८३ धावांची खेळी साकारता आली.


साधारण ४ महिन्यानंतर भारतीय संघासाठी खेळणाऱ्या यशस्वी जायसवालला या सामन्यात जरी अर्धशतकीय खेळी साकारता आली नसली तरी त्याने या दरम्यान एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला.


यशस्वी २०२४मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने या वर्षी तीनही फॉरमॅटमध्ये मिळून ८४८ धावा केल्या. या सामन्याआधी २०२४मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा पहिल्या स्थानावर होता. मात्र आता यशस्वी जायसवाल अव्वल स्थानावर आला आहे.


जगातील इतर क्रिकेटर्सबाबत बोलायचे झाल्यास या यादीत यशस्वी जायसवाल पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर अफगाणिस्तानचा इब्राहिम जादरानआहे. यानंतर कुसल मेंडिसचा नंबर लागतो. तर मेंडिससह रोहित शर्मा संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर आहे.

Comments
Add Comment

हर्षित राणाची जागा जाणार? टीम इंडियात आणखी एका खेळाडूचे पुनरागमन !

मुंबई : टीम इंडियामध्ये आणखी एक वरिष्ठ खेळाडू संघात परतण्याच्या तयारीत असून, त्याच्या पुनरागमनामुळे मुख्य

टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरची प्रकृती सुधारतेय: भारतात कधी परतणार?

ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर पुन्हा एकदा दुखापतीच्या संकटात सापडला आहे. नुकताच

भारत - ऑस्ट्रेलिया पहिला T20 सामना २९ ऑक्टोबरला, पहा टीम इंडियाची संभाव्य Playing XI

मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा पराभव झाला. ही मालिका ऑस्ट्रेलियाने २-१

बाईपण भारी देवा ! ७ महिन्यांची गरोदर तरीही १४५ किलो वजन उचलत जिंकली वेटलिफ्टिंग स्पर्धा

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नसत फक्त जिद्द असायला हवी . दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे सिद्ध

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचा २९ ऑक्टोबरपासून थरार

दुपारी १.४५ वाजता सामन्यांना होणार सुरुवात मुंबई  : भारतीय संघाचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. नुकतीच तीन

श्रेयस अय्यर आयसीयूमधून बाहेर

गंभीर दुखापतीनंतर प्रकृती स्थिर मुंबई  : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर याची प्रकृती अद्यापही