मुंबई : सध्या राज्यभरात आरक्षणाचा (Reservation) मुद्दा जोर धरत आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा शांतता मोर्चाला सुरुवात केली आहे. मराठा आरक्षणात सगेसोयऱ्यांबाबत निर्णय घेण्यासाठी त्यांनी सरकारला १३ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. मराठ्यांनी ओबीसीतून आरक्षण मिळण्याविषयी मागणी केली आहे, तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देऊ नये, अशी मागणी ओबीसी समाजाने केली आहे. यामुळे राज्य सरकारची कोंडी झाली आहे व यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे. मात्र, विरोधक राज्य सरकारवर याबाबत टीका करत आहे. सत्तेत असूनही आरक्षण देऊ शकत नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी सरकारवर केला. यावर लोकसभा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी वडेट्टीवारांचा खरपूस समाचार घेतला आहे.
खासदार नारायण राणे म्हणाले, वडेट्टीवार कोण आहेत? विरोधी पक्षनेते ना? त्यांना विषय कळत नाही. गडचिरोलीचा आहे तो, त्याला आमदार आधी मी बनवलं. आता तो विरोधी पक्षनेता आहे. त्याच्यामुळे कशाने काय करता येतं? याचा त्याने अभ्यास करावा आणि मग बोलावं, असा घणाघात नारायण राणे यांनी केला.
मुंबई : येत्या काही दिवसांत मुंबईकरांना उष्णतेसह वाढत्या आर्द्रतेचा तडाखा सहन करावा लागण्याची शक्यता आहे.…
मुख्यमंत्री फडणवीसांची शेतकऱ्यांना भावनिक साद अमरावती : विदर्भातील अमरावती येथे विमानतळाचे लोकार्पण केल्यानंतर विदर्भातील प्रकल्पग्रस्त…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगमधील ३२व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने राजस्थान रॉयल्सला विजयासाठी १८९ धावांचे आव्हान…
मुंबई : नॅशनल हेराल्डची मालमत्ता हडपणा-या काँग्रेसच्या आंदोलनाला भाजपाचा कडवा विरोध असून काँग्रेसचे हे आंदोलन…
मुंबई : लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस थांबत असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्यावर प्रवाशांना आरोग्यदायी आणि किफायतशीर…
मुंबई : आगामी काळात रायगड जिल्ह्यात भाजपा शतप्रतिशत होणार असा विश्वास भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र…