Narayan Rane : कोण वडेट्टीवार? त्यांना आमदार आधी मी बनवलं!

  203

खासदार नारायण राणे यांचं वक्तव्य 


मुंबई : सध्या राज्यभरात आरक्षणाचा (Reservation) मुद्दा जोर धरत आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा शांतता मोर्चाला सुरुवात केली आहे. मराठा आरक्षणात सगेसोयऱ्यांबाबत निर्णय घेण्यासाठी त्यांनी सरकारला १३ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. मराठ्यांनी ओबीसीतून आरक्षण मिळण्याविषयी मागणी केली आहे, तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देऊ नये, अशी मागणी ओबीसी समाजाने केली आहे. यामुळे राज्य सरकारची कोंडी झाली आहे व यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे. मात्र, विरोधक राज्य सरकारवर याबाबत टीका करत आहे. सत्तेत असूनही आरक्षण देऊ शकत नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी सरकारवर केला. यावर लोकसभा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी वडेट्टीवारांचा खरपूस समाचार घेतला आहे.


खासदार नारायण राणे म्हणाले, वडेट्टीवार कोण आहेत? विरोधी पक्षनेते ना? त्यांना विषय कळत नाही. गडचिरोलीचा आहे तो, त्याला आमदार आधी मी बनवलं. आता तो विरोधी पक्षनेता आहे. त्याच्यामुळे कशाने काय करता येतं? याचा त्याने अभ्यास करावा आणि मग बोलावं, असा घणाघात नारायण राणे यांनी केला.

Comments
Add Comment

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई

शाळांमध्ये १४ ऑगस्टपासून पसायदानाचे पठण

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) :

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना