Narayan Rane : कोण वडेट्टीवार? त्यांना आमदार आधी मी बनवलं!

खासदार नारायण राणे यांचं वक्तव्य 


मुंबई : सध्या राज्यभरात आरक्षणाचा (Reservation) मुद्दा जोर धरत आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा शांतता मोर्चाला सुरुवात केली आहे. मराठा आरक्षणात सगेसोयऱ्यांबाबत निर्णय घेण्यासाठी त्यांनी सरकारला १३ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. मराठ्यांनी ओबीसीतून आरक्षण मिळण्याविषयी मागणी केली आहे, तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देऊ नये, अशी मागणी ओबीसी समाजाने केली आहे. यामुळे राज्य सरकारची कोंडी झाली आहे व यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे. मात्र, विरोधक राज्य सरकारवर याबाबत टीका करत आहे. सत्तेत असूनही आरक्षण देऊ शकत नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी सरकारवर केला. यावर लोकसभा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी वडेट्टीवारांचा खरपूस समाचार घेतला आहे.


खासदार नारायण राणे म्हणाले, वडेट्टीवार कोण आहेत? विरोधी पक्षनेते ना? त्यांना विषय कळत नाही. गडचिरोलीचा आहे तो, त्याला आमदार आधी मी बनवलं. आता तो विरोधी पक्षनेता आहे. त्याच्यामुळे कशाने काय करता येतं? याचा त्याने अभ्यास करावा आणि मग बोलावं, असा घणाघात नारायण राणे यांनी केला.

Comments
Add Comment

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.

नारळासाठी ४५ रुपयांची फोडणी; आवक घटल्याने मुंबईकरांना भुर्दंड

मुंबई : सण, उत्सव कालावधीत नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबईकरांना सध्या या नारळासाठी ४५ ते ५० रुपये मोजावे