Manoj Jarange Patil : छत्रपती संभाजीनगरमध्ये शनिवारी निघणार मराठ्यांची महाशांतता रॅली!

१०० वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ४००० पोलिसांचा तगडा बंदोबस्त


छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळवून देण्यासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची येत्या १३ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) शांतता रॅली (Shantata Rally) निघणार आहे. सगेसोयरेच्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर आणि मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घेण्याच्या मागण्यांसाठी ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. या महाशांतता रॅलीची जय्यत तयारी सुरु झाली असून प्रशासन देखील कामाला लागले आहे. रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांची महाशांतता रॅली शनिवारी १३ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगरात पार पडणार आहे. या रॅलीसाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले आहे. सकाळी ११ वाजता संभाजीनगरच्या सिडको येथील वसंतराव नाईक चौकातून या रॅलीला प्रारंभ होणार आहे. तर क्रांती चौक येथे या रॅलीचा समारोप होणार आहे. या रॅलीमध्ये १०० वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ४००० पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. त्यासोबत मराठा बांधव देखील या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



जालना रोड काही काळ बंद


मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांच्या छत्रपती संभाजीनगरमधील महाशांतता रॅलीसाठी मुख्य वर्दळीचा मार्ग असलेला जालना रोड सुमारे ८ ते ९ तासांसाठी बंद राहणार आहे. दरम्यान या रॅलीमध्ये पोलिसांचे विशेष लक्ष असणार असून रॅलीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून समन्वयकांना सूचना देण्यात आल्या आहेत.



सहभागी समाज बांधवांसाठी विशेष सुविधा


लाखोच्या संख्येने समाज बांधव जिल्हाभरातून या रॅलीत सहभागी होणार आहेत. या सर्वांसाठी चहा, नाश्ता आणि पाण्याची व्यवस्था रॅली मार्गावर करण्यात आली आहे. तसेच रॅलीच्या मार्गावर सहभागी समाज बांधवांची गैरसोय होऊ नये यासाठी स्वयंसेवक, ॲम्ब्युलन्स, फिरती स्वच्छतागृहे ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर रॅलीदरम्यान कोणाला उपचाराची गरज भासली तर अत्याधुनिक १० ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर आणि अनुभवी नर्स औषधोपचारासह सज्ज असणार आहेत.



वाहनतळाची व्यवस्था


छत्रपती संभाजीनगरमधील रॅलीदरम्यान मनोज जरांगे यांच्यासाठी क्रांती चौक येथे भव्य स्टेज उभारण्यात येणार आहे. तसेच विविध गावात आणि तालुक्याच्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक बैठका घेत आहेत. यामध्ये हजेरी लावणाऱ्या समाज बांधवांसाठी विविध ठिकाणी वाहन पार्किंगची सेवा उपलब्ध करुन दिली आहे. पैठण तालुक्यातून येणाऱ्यांसाठी बीड बायपास रोडवरील जबिंदा मैदान, कन्नड, खुलताबाद, वैजापूर तर गंगापूरकडून येणाऱ्या वाहनांसाठी कर्णपुरा, अयोध्या मैदान येथे, तर फुलंब्री आणि सिल्लोड येथील समाज बांधवांची वाहने जाधववाडी (नवा मोंढा) येथे वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा